शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Adhik Maas 2020: अधिक महिन्यात कोणते संकल्प करावेत?; काय आहे महत्त्व?... जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: September 21, 2020 15:35 IST

Adhik Maas 2020: प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते. 

ठळक मुद्दे२१ सप्टेंबर २०२० रोजी वैधृति योग आहे. या वैधृति पर्वात तिळाचे सोळा लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या, सोळा संख्येत दान कराव्यात. सोमवारी शिवामूठ वाहणे, कोरडा शिधा दान करणे, एखाद्या ग्रंथालयाला, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करणे, घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या तसबिरीला एक तुळशी दल वाहणे, पांढरे फुल वाहणे, उपास्य देवतेचा जप करणे, इ. संकल्प ज्या गोष्टींची आपल्याला सहज पूर्तता करता येईल, अशाच गोष्टींचा संकल्प करावा.

ज्योत्स्ना गाडगीळ. 

पुण्यसंचयासाठी उत्तम कालखंड मानला जाणारा अधिक महिना १८ सप्टेंबरपासून सुरू झाला असून १६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक मासात अधिक फलप्राप्तीसाठी आपण हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. त्यात पूजेइतकेच महत्त्व असते, संकल्पाला. मात्र, संकल्प करण्याआधी किंवा संकल्प सोडण्याआधी, त्याचा अर्थ काय आणि तो कोणकोणत्या प्रकारे केला जातो, ते जाणून घेऊया. 

शपथ आणि संकल्प यातील फरक :

हाती घेतलेले कोणतेही कार्य सिद्धीस जावे, म्हणून आपण संकल्प करतो. संकल्प स्वेच्छेने केला जातो. याउलट शपथ, स्वेच्छेने किंवा अनिच्छेने घेतली जाते. शपथ पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी जाचक वाटतात, तर संकल्प पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी आव्हानात्मक वाटतात. शपथ रागाच्या भरात घेतली जाऊ शकते, मात्र संकल्प हा चांगले कार्य तडीस नेण्यासाठीच केला जातो. म्हणून अधिक मासाच्या वेळी धार्मिक अनुष्ठान मांडले असता, यथाशक्ती संकल्प पार पाडले जातात. 

हेही वाचाः तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी

संकल्प करत असताना म्हणायचा श्लोक :

सङकल्पमूल: कामो वै यज्ञा: सङकल्पसम्भवा:।व्रता नियमधर्माश्च सर्वे सङकल्पजा: स्मृता।।

अर्थ : आपल्या ईच्छा पूर्ण व्हाव्यात, या हेतूमधून संकल्पाचा उगम झाला. सर्व यज्ञ संकल्पानंतर संपन्न होतात, त्याचप्रमाणे सर्व व्रते, नियम व धर्म संकल्पातून निर्माण होतात. संकल्पाच्या वेळी देवतेचा उच्चार केल्यामुळे देवता सुक्ष्म रूपाने उपस्थित होतात व संकल्प तडीस नेण्यास मदत करतात. 

संकल्प कधी करतात?

अनेक दिवस चालणारे गुरुचरित्र, भागवतसप्ताह, चण्डी, अथर्वशीर्ष, शिवकवच इ. अनुष्ठाने आरंभ करण्यापूर्वी संकल्प सोडले जातात. संकल्प सोडण्याच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला 'उदक' म्हणतात. उदकसेवनावाचून झालेला संकल्प व्यर्थ असतो, असे म्हणतात. नित्यसंकल्पात 'संकल्पोक्त फलवाप्यते, संकल्पोक्तसंख्यापरिपूर्तये' असे म्हटले जाते. 

हेही वाचाः देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

अधिक मासात कोणकोणते संकल्प करता येऊ शकतात?

चार्तुमासात, श्रावणी सोमवारी आपण जे संकल्प करतो, त्याचीच पुनरावृत्ती अधिक मासात केली तरी चालते. त्यासाठी वेगळ्या संकल्पांचे आयोजन करण्याची गरज नाही. मूळात, फार कठीण संकल्प करू नयेत. ज्या गोष्टींची आपल्याला सहज पूर्तता करता येईल, अशाच गोष्टींचा संकल्प करावा, म्हणजे तो सिद्धीस नेता येतो. 

जसे की, दर सोमवारी शिवामूठ वाहणे, कोरडा शिधा दान करणे, एखाद्या ग्रंथालयाला, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करणे, घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या तसबिरीला एक तुळशी दल वाहणे, रोज एखादे पांढरे फुल वाहणे, उपास्य देवतेचा जप करणे, इ. गोष्टींचा आपण संकल्प करू शकतो. 

२१ सप्टेंबर २०२० रोजी वैधृति योग आहे. या वैधृति पर्वात तिळाचे सोळा लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या, सोळा संख्येत दान कराव्यात. 

प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते. 

भगवान श्रीकृष्णाची तुला करत असताना, त्यांची प्रिय पत्नी सत्यभामा हिने तिजोरीतले सर्व धन पारड्यात टाकले, तरी श्रीकृष्णाचे पारडे वर जात नव्हते. तेव्हा अत्यंत भक्तीभावाने रुक्मिणीने एक तुळशीचे पान धनाची राशी असलेल्या पारड्यात ठेवले आणि कृष्णाचे पारडे वर झाले. या कथेवरून लक्षात येते, भक्तीभावाने वाहिलेली कोणतीही गोष्ट, कोणताही संकल्प भगवंतापर्यंत पोहोचतो. फक्त त्यासाठी शुध्द भक्ती, शुद्ध आचरण आणि शुद्ध मनाने संकल्प करायला हवा.

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना