शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

Adhik Maas 2020: अधिक महिन्यात कोणते संकल्प करावेत?; काय आहे महत्त्व?... जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: September 21, 2020 15:35 IST

Adhik Maas 2020: प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते. 

ठळक मुद्दे२१ सप्टेंबर २०२० रोजी वैधृति योग आहे. या वैधृति पर्वात तिळाचे सोळा लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या, सोळा संख्येत दान कराव्यात. सोमवारी शिवामूठ वाहणे, कोरडा शिधा दान करणे, एखाद्या ग्रंथालयाला, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करणे, घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या तसबिरीला एक तुळशी दल वाहणे, पांढरे फुल वाहणे, उपास्य देवतेचा जप करणे, इ. संकल्प ज्या गोष्टींची आपल्याला सहज पूर्तता करता येईल, अशाच गोष्टींचा संकल्प करावा.

ज्योत्स्ना गाडगीळ. 

पुण्यसंचयासाठी उत्तम कालखंड मानला जाणारा अधिक महिना १८ सप्टेंबरपासून सुरू झाला असून १६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक मासात अधिक फलप्राप्तीसाठी आपण हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. त्यात पूजेइतकेच महत्त्व असते, संकल्पाला. मात्र, संकल्प करण्याआधी किंवा संकल्प सोडण्याआधी, त्याचा अर्थ काय आणि तो कोणकोणत्या प्रकारे केला जातो, ते जाणून घेऊया. 

शपथ आणि संकल्प यातील फरक :

हाती घेतलेले कोणतेही कार्य सिद्धीस जावे, म्हणून आपण संकल्प करतो. संकल्प स्वेच्छेने केला जातो. याउलट शपथ, स्वेच्छेने किंवा अनिच्छेने घेतली जाते. शपथ पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी जाचक वाटतात, तर संकल्प पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी आव्हानात्मक वाटतात. शपथ रागाच्या भरात घेतली जाऊ शकते, मात्र संकल्प हा चांगले कार्य तडीस नेण्यासाठीच केला जातो. म्हणून अधिक मासाच्या वेळी धार्मिक अनुष्ठान मांडले असता, यथाशक्ती संकल्प पार पाडले जातात. 

हेही वाचाः तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी

संकल्प करत असताना म्हणायचा श्लोक :

सङकल्पमूल: कामो वै यज्ञा: सङकल्पसम्भवा:।व्रता नियमधर्माश्च सर्वे सङकल्पजा: स्मृता।।

अर्थ : आपल्या ईच्छा पूर्ण व्हाव्यात, या हेतूमधून संकल्पाचा उगम झाला. सर्व यज्ञ संकल्पानंतर संपन्न होतात, त्याचप्रमाणे सर्व व्रते, नियम व धर्म संकल्पातून निर्माण होतात. संकल्पाच्या वेळी देवतेचा उच्चार केल्यामुळे देवता सुक्ष्म रूपाने उपस्थित होतात व संकल्प तडीस नेण्यास मदत करतात. 

संकल्प कधी करतात?

अनेक दिवस चालणारे गुरुचरित्र, भागवतसप्ताह, चण्डी, अथर्वशीर्ष, शिवकवच इ. अनुष्ठाने आरंभ करण्यापूर्वी संकल्प सोडले जातात. संकल्प सोडण्याच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला 'उदक' म्हणतात. उदकसेवनावाचून झालेला संकल्प व्यर्थ असतो, असे म्हणतात. नित्यसंकल्पात 'संकल्पोक्त फलवाप्यते, संकल्पोक्तसंख्यापरिपूर्तये' असे म्हटले जाते. 

हेही वाचाः देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

अधिक मासात कोणकोणते संकल्प करता येऊ शकतात?

चार्तुमासात, श्रावणी सोमवारी आपण जे संकल्प करतो, त्याचीच पुनरावृत्ती अधिक मासात केली तरी चालते. त्यासाठी वेगळ्या संकल्पांचे आयोजन करण्याची गरज नाही. मूळात, फार कठीण संकल्प करू नयेत. ज्या गोष्टींची आपल्याला सहज पूर्तता करता येईल, अशाच गोष्टींचा संकल्प करावा, म्हणजे तो सिद्धीस नेता येतो. 

जसे की, दर सोमवारी शिवामूठ वाहणे, कोरडा शिधा दान करणे, एखाद्या ग्रंथालयाला, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करणे, घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या तसबिरीला एक तुळशी दल वाहणे, रोज एखादे पांढरे फुल वाहणे, उपास्य देवतेचा जप करणे, इ. गोष्टींचा आपण संकल्प करू शकतो. 

२१ सप्टेंबर २०२० रोजी वैधृति योग आहे. या वैधृति पर्वात तिळाचे सोळा लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या, सोळा संख्येत दान कराव्यात. 

प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते. 

भगवान श्रीकृष्णाची तुला करत असताना, त्यांची प्रिय पत्नी सत्यभामा हिने तिजोरीतले सर्व धन पारड्यात टाकले, तरी श्रीकृष्णाचे पारडे वर जात नव्हते. तेव्हा अत्यंत भक्तीभावाने रुक्मिणीने एक तुळशीचे पान धनाची राशी असलेल्या पारड्यात ठेवले आणि कृष्णाचे पारडे वर झाले. या कथेवरून लक्षात येते, भक्तीभावाने वाहिलेली कोणतीही गोष्ट, कोणताही संकल्प भगवंतापर्यंत पोहोचतो. फक्त त्यासाठी शुध्द भक्ती, शुद्ध आचरण आणि शुद्ध मनाने संकल्प करायला हवा.

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना