शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जालना ‘झेडपी’त २०० संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:33 IST

जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला.

ठळक मुद्देसिंचन विहिरींवरून रणकंदण : सभा तहकूब, खोतकर-लोणीकर, टोपेंमध्ये खडाजंगी, शेतक-यांच्या गोंधळाने दणाणले सभागृह

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालनाजिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी या शेतकºयांनी सिंचन विहिरींच्या मुद्यावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते. त्यातच सिंचन विहिरीच्या प्रश्नावरून जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यात खडाजंगी झाली. याचवेळी न्यायायलीन आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खूर्ची जप्त केल्याने या गोंधळात आणखी भर पडली. यामुळे आजची स्थायी सभा तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्ष खोतकर यांनी जाहीर केला.गेल्या वर्षभरापासून सिंचन विहिरींच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जि.प. सदस्य राहुल लोणीकर यांच्यात वाद आहे. एकट्या परतूर तालुक्यातील सिंंचन विहिरी मंजूर करताना प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रशासकीय निकष डावलेले गेल्याने ८० शेतकºयांच्या विहीरींच्या कामाला आडकाठी आणली जात आहे. यासाठी मंत्रालय पातळीवर राहुल लोणीकर यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्फत पाठपुरावा करून जास्तीच्या सिंचन विहिरींना प्रशासकीय मंजुरी आणल्याचे सभागृहात सांगितले. मात्र जिल्हाधिकाºयांनी दोन दिवसांपूर्वी अभ्यास करून जिल्ह्यातील जवळपास ७७६ विहिरींची मान्यता रद्द केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष खोतकर आणि उपाध्यक्ष टोपे यांनी लोणीकर यांच्याकडे सोपविला, मात्र तो त्यांना मान्य नसल्याचे त्यांनी सांगितल्याने या गोंधळात भर पडली.मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या भोकरदन येथे पाणी टंचाई आढावा बैठकीसाठी गेल्या होत्या. प्रथम त्यांना बोलावा असा आग्रह सभागृहातील शेतकºयांनी लावून धरला. शेवटी अरोरा यांना ती बैठक अर्धवट सोडून जालन्यात परतावे लागले. त्यांनी आल्यावर शेतकºयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझा विहिरी नामंजूर करण्यात कुठलाच स्वार्थ नाही. परंतु जर काही चुकीची कामे झाली असतील त्यांना रोखणे हे माझे कर्तव्य असल्याने आपण थेट प्रत्यक्ष पाहणी करून नंतर तो अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविल्याचे सांगितले. हा गोंधळ सायंकाळ पर्यंच चालल्याने कामकाज ठप्प झाले होते.लेखी आश्वासनाने समाधानएवढे सर्व शेतकरी येथे येण्या ऐवजी माझी वैयक्तिक भेट घेतली असती तर हा प्रश्न सुटला असता असे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगून आलेल्या शेतकºयांचे समाधान केले. तसेच सिंचन विहिरी संदर्भात लेखी आश्वास दिल्यानंतर सकाळपासून आलेले शेतकरी सायंकाळी समाधानाने परतले.संतप्त शेतकºयांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर तसेच अन्य अधिकाºयांना घेराव घातला. यावेळी अनेकांनी त्यांना सभागृहबाहेर जाऊ देण्यास नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला होता.गोंधळात केली अध्यक्षांची खूर्ची जप्तबदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे १९९९ मध्ये पाझर तलावासाठी एका धामणगावकर यांची जमीन संपादीत केली होती. परंतु त्या जमीनीचा वाढीव मावेजा जो की साडेचार लाख रूपये देण्यात आला नव्हता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार सभागृातील इतर साहित्य तसेच खूर्ची आणि गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. संजय काळाबांडे यांनी दिली. यामुळे तरी आता संबंधित शेतकºयाला न्याय मिळेल असेही काळाबांडे म्हणाले. वाढीव मावेजा न दिल्यास पुढील कायदेशीर कारवाई लवकरच दाखल करण्यात येणार असून, सीईओ आणि जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांची गाडी जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalanaजालनाzpजिल्हा परिषदFarmerशेतकरीagitationआंदोलन