शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

जालना ‘झेडपी’त २०० संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:33 IST

जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला.

ठळक मुद्देसिंचन विहिरींवरून रणकंदण : सभा तहकूब, खोतकर-लोणीकर, टोपेंमध्ये खडाजंगी, शेतक-यांच्या गोंधळाने दणाणले सभागृह

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालनाजिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी या शेतकºयांनी सिंचन विहिरींच्या मुद्यावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते. त्यातच सिंचन विहिरीच्या प्रश्नावरून जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यात खडाजंगी झाली. याचवेळी न्यायायलीन आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खूर्ची जप्त केल्याने या गोंधळात आणखी भर पडली. यामुळे आजची स्थायी सभा तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्ष खोतकर यांनी जाहीर केला.गेल्या वर्षभरापासून सिंचन विहिरींच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जि.प. सदस्य राहुल लोणीकर यांच्यात वाद आहे. एकट्या परतूर तालुक्यातील सिंंचन विहिरी मंजूर करताना प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रशासकीय निकष डावलेले गेल्याने ८० शेतकºयांच्या विहीरींच्या कामाला आडकाठी आणली जात आहे. यासाठी मंत्रालय पातळीवर राहुल लोणीकर यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्फत पाठपुरावा करून जास्तीच्या सिंचन विहिरींना प्रशासकीय मंजुरी आणल्याचे सभागृहात सांगितले. मात्र जिल्हाधिकाºयांनी दोन दिवसांपूर्वी अभ्यास करून जिल्ह्यातील जवळपास ७७६ विहिरींची मान्यता रद्द केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष खोतकर आणि उपाध्यक्ष टोपे यांनी लोणीकर यांच्याकडे सोपविला, मात्र तो त्यांना मान्य नसल्याचे त्यांनी सांगितल्याने या गोंधळात भर पडली.मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या भोकरदन येथे पाणी टंचाई आढावा बैठकीसाठी गेल्या होत्या. प्रथम त्यांना बोलावा असा आग्रह सभागृहातील शेतकºयांनी लावून धरला. शेवटी अरोरा यांना ती बैठक अर्धवट सोडून जालन्यात परतावे लागले. त्यांनी आल्यावर शेतकºयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझा विहिरी नामंजूर करण्यात कुठलाच स्वार्थ नाही. परंतु जर काही चुकीची कामे झाली असतील त्यांना रोखणे हे माझे कर्तव्य असल्याने आपण थेट प्रत्यक्ष पाहणी करून नंतर तो अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविल्याचे सांगितले. हा गोंधळ सायंकाळ पर्यंच चालल्याने कामकाज ठप्प झाले होते.लेखी आश्वासनाने समाधानएवढे सर्व शेतकरी येथे येण्या ऐवजी माझी वैयक्तिक भेट घेतली असती तर हा प्रश्न सुटला असता असे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगून आलेल्या शेतकºयांचे समाधान केले. तसेच सिंचन विहिरी संदर्भात लेखी आश्वास दिल्यानंतर सकाळपासून आलेले शेतकरी सायंकाळी समाधानाने परतले.संतप्त शेतकºयांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर तसेच अन्य अधिकाºयांना घेराव घातला. यावेळी अनेकांनी त्यांना सभागृहबाहेर जाऊ देण्यास नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला होता.गोंधळात केली अध्यक्षांची खूर्ची जप्तबदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे १९९९ मध्ये पाझर तलावासाठी एका धामणगावकर यांची जमीन संपादीत केली होती. परंतु त्या जमीनीचा वाढीव मावेजा जो की साडेचार लाख रूपये देण्यात आला नव्हता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार सभागृातील इतर साहित्य तसेच खूर्ची आणि गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. संजय काळाबांडे यांनी दिली. यामुळे तरी आता संबंधित शेतकºयाला न्याय मिळेल असेही काळाबांडे म्हणाले. वाढीव मावेजा न दिल्यास पुढील कायदेशीर कारवाई लवकरच दाखल करण्यात येणार असून, सीईओ आणि जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांची गाडी जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalanaजालनाzpजिल्हा परिषदFarmerशेतकरीagitationआंदोलन