शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जालना ‘झेडपी’त २०० संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:33 IST

जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला.

ठळक मुद्देसिंचन विहिरींवरून रणकंदण : सभा तहकूब, खोतकर-लोणीकर, टोपेंमध्ये खडाजंगी, शेतक-यांच्या गोंधळाने दणाणले सभागृह

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालनाजिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी या शेतकºयांनी सिंचन विहिरींच्या मुद्यावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते. त्यातच सिंचन विहिरीच्या प्रश्नावरून जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यात खडाजंगी झाली. याचवेळी न्यायायलीन आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खूर्ची जप्त केल्याने या गोंधळात आणखी भर पडली. यामुळे आजची स्थायी सभा तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्ष खोतकर यांनी जाहीर केला.गेल्या वर्षभरापासून सिंचन विहिरींच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जि.प. सदस्य राहुल लोणीकर यांच्यात वाद आहे. एकट्या परतूर तालुक्यातील सिंंचन विहिरी मंजूर करताना प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रशासकीय निकष डावलेले गेल्याने ८० शेतकºयांच्या विहीरींच्या कामाला आडकाठी आणली जात आहे. यासाठी मंत्रालय पातळीवर राहुल लोणीकर यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्फत पाठपुरावा करून जास्तीच्या सिंचन विहिरींना प्रशासकीय मंजुरी आणल्याचे सभागृहात सांगितले. मात्र जिल्हाधिकाºयांनी दोन दिवसांपूर्वी अभ्यास करून जिल्ह्यातील जवळपास ७७६ विहिरींची मान्यता रद्द केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष खोतकर आणि उपाध्यक्ष टोपे यांनी लोणीकर यांच्याकडे सोपविला, मात्र तो त्यांना मान्य नसल्याचे त्यांनी सांगितल्याने या गोंधळात भर पडली.मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या भोकरदन येथे पाणी टंचाई आढावा बैठकीसाठी गेल्या होत्या. प्रथम त्यांना बोलावा असा आग्रह सभागृहातील शेतकºयांनी लावून धरला. शेवटी अरोरा यांना ती बैठक अर्धवट सोडून जालन्यात परतावे लागले. त्यांनी आल्यावर शेतकºयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझा विहिरी नामंजूर करण्यात कुठलाच स्वार्थ नाही. परंतु जर काही चुकीची कामे झाली असतील त्यांना रोखणे हे माझे कर्तव्य असल्याने आपण थेट प्रत्यक्ष पाहणी करून नंतर तो अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविल्याचे सांगितले. हा गोंधळ सायंकाळ पर्यंच चालल्याने कामकाज ठप्प झाले होते.लेखी आश्वासनाने समाधानएवढे सर्व शेतकरी येथे येण्या ऐवजी माझी वैयक्तिक भेट घेतली असती तर हा प्रश्न सुटला असता असे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगून आलेल्या शेतकºयांचे समाधान केले. तसेच सिंचन विहिरी संदर्भात लेखी आश्वास दिल्यानंतर सकाळपासून आलेले शेतकरी सायंकाळी समाधानाने परतले.संतप्त शेतकºयांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर तसेच अन्य अधिकाºयांना घेराव घातला. यावेळी अनेकांनी त्यांना सभागृहबाहेर जाऊ देण्यास नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला होता.गोंधळात केली अध्यक्षांची खूर्ची जप्तबदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे १९९९ मध्ये पाझर तलावासाठी एका धामणगावकर यांची जमीन संपादीत केली होती. परंतु त्या जमीनीचा वाढीव मावेजा जो की साडेचार लाख रूपये देण्यात आला नव्हता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार सभागृातील इतर साहित्य तसेच खूर्ची आणि गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. संजय काळाबांडे यांनी दिली. यामुळे तरी आता संबंधित शेतकºयाला न्याय मिळेल असेही काळाबांडे म्हणाले. वाढीव मावेजा न दिल्यास पुढील कायदेशीर कारवाई लवकरच दाखल करण्यात येणार असून, सीईओ आणि जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांची गाडी जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalanaजालनाzpजिल्हा परिषदFarmerशेतकरीagitationआंदोलन