शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तलावात आंघोळ करताना उसतोड मजुराचा पाय घसरला, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 15:29 IST

कड्याच्या ऊसतोड मजूराचा सिध्दटेकच्या तलावात बुडून मृत्यू!

- नितीन कांबळेकडा (बीड): अंघोळीसाठी गेलेल्या ऊसतोड मजूराचा पाय घसरून तलावात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.मनोज विलास कवडे ( २६ रा.कडा) असे मृत मजूराचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील कडा येथील मनोज कवडे हा अविवाहित तरूण अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणीचे काम करतो. सध्या सिध्दटेक येथे मजूरांचा फड ऊसतोडणीसाठी आलेला आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान मनोज जवळच असलेल्या तलावावर एकटा अंघोळीसाठी गेला होता.अंघोळ करत असताना अचानक पाय घसरल्याने तो तलावात बुडाला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, मनोज उशिरापर्यंत परत न आल्याने इतर मजूरांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा तलावाच्या कडेला त्याचे कपडे आढळून आले. पाण्यात बूडाल्याचा संशय येताच शुक्रवारी सकाळपासून ग्रामस्थांसह इतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तलावात शोध सुरू केला. शुक्रवारी सायंकाळी मृतदेह आढळून आला. रात्री उशिरा कडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परिवार आहे. अचानक मृत्यूची वार्ता आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेBeedबीडDeathमृत्यू