शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

शेतकरी मित्र असो की पुत्र; नेत्यांनो चारा, पाण्यासाठी कधी बोलणार?

By सोमनाथ खताळ | Updated: April 9, 2024 19:07 IST

पीपल्स मॅनिफेस्टो: शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संताप : उमेदवारांसह राजकीय नेते केवळ प्रचारातच व्यस्त

बीड : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एप्रिल महिन्यातच १२२ गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार आणि नेतेमंडळी व्यस्त आहे. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार, असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.

जिल्ह्यात गावे, वाड्यावस्त्यांची संख्या ही दीड हजारांच्या घरात आहे. लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील छोटे-मोठे प्रकल्प कोरडेठाक पडत आहेत. सद्यस्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १२२ गावांत एप्रिलमध्येच टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार? याची चिंता सर्वांनाच आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमाेल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त आहे.

प्रशासन म्हणतेय १९२ दिवस पुरेल चाराजिल्ह्यात लहान, मोठे, शेळी, मेंढ्या असे १३ लाखांच्या घरात पशुधन आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन ३ किलो, तर मोठ्यांसाठी ६ किलो चारा लागतो. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही १९२ दिवस चारा पुरेल असा दावा प्रशासनाने केला आहे. असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागात चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे.

जिल्ह्यात १४४ टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच १२२ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात आणखी टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विहीर, बोअर अधिग्रहण केले जात आहे. आतापर्यंत १४३ जलस्त्रोत अधिगृहीत केले आहेत.

हा पाण्याचा अपव्यय कधी थांबवणार?जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत असतानाही आजही काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर आदी ठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही जागोजागी लिकेज झाल्या आहेत. यामुळेही लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

आवश्यक उपाययोजना तातडीने करादुष्काळजन्य परिस्थितीत पिण्याचे पाणी, चारा, ऊसतोड मजुरांना रेशन यांसह आवश्यक उपाययोजना तातडीने कार्यान्वित करा, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी केली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रशासन स्तरावर बैठका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मुंडे यांनी दुष्काळ उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्याचे सांगण्यात आले.

अशी आहे आकडेवारीजलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा शिल्लक- १६ टक्केबोअर व विहिरी अधिग्रहित - १४३

कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरूबीड ६०गेवराई ५९शिरूर ६पाटोदा ४आष्टी ९परळी ५धारूर १एकूण १४४

बोअर, विहीर अधिग्रहणबीड २४गेवराई १०वडवणी ५शिरूरकासार ८पाटोदा २अंबाजोगाई ३८केज २२परळी २धारूर २०माजलगाव ८एकूण १४३

टॅग्स :Waterपाणीbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४