शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

शेतकरी मित्र असो की पुत्र; नेत्यांनो चारा, पाण्यासाठी कधी बोलणार?

By सोमनाथ खताळ | Updated: April 9, 2024 19:07 IST

पीपल्स मॅनिफेस्टो: शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संताप : उमेदवारांसह राजकीय नेते केवळ प्रचारातच व्यस्त

बीड : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एप्रिल महिन्यातच १२२ गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार आणि नेतेमंडळी व्यस्त आहे. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार, असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.

जिल्ह्यात गावे, वाड्यावस्त्यांची संख्या ही दीड हजारांच्या घरात आहे. लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील छोटे-मोठे प्रकल्प कोरडेठाक पडत आहेत. सद्यस्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १२२ गावांत एप्रिलमध्येच टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार? याची चिंता सर्वांनाच आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमाेल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त आहे.

प्रशासन म्हणतेय १९२ दिवस पुरेल चाराजिल्ह्यात लहान, मोठे, शेळी, मेंढ्या असे १३ लाखांच्या घरात पशुधन आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन ३ किलो, तर मोठ्यांसाठी ६ किलो चारा लागतो. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही १९२ दिवस चारा पुरेल असा दावा प्रशासनाने केला आहे. असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागात चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे.

जिल्ह्यात १४४ टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच १२२ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात आणखी टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विहीर, बोअर अधिग्रहण केले जात आहे. आतापर्यंत १४३ जलस्त्रोत अधिगृहीत केले आहेत.

हा पाण्याचा अपव्यय कधी थांबवणार?जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत असतानाही आजही काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर आदी ठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही जागोजागी लिकेज झाल्या आहेत. यामुळेही लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

आवश्यक उपाययोजना तातडीने करादुष्काळजन्य परिस्थितीत पिण्याचे पाणी, चारा, ऊसतोड मजुरांना रेशन यांसह आवश्यक उपाययोजना तातडीने कार्यान्वित करा, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी केली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रशासन स्तरावर बैठका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मुंडे यांनी दुष्काळ उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्याचे सांगण्यात आले.

अशी आहे आकडेवारीजलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा शिल्लक- १६ टक्केबोअर व विहिरी अधिग्रहित - १४३

कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरूबीड ६०गेवराई ५९शिरूर ६पाटोदा ४आष्टी ९परळी ५धारूर १एकूण १४४

बोअर, विहीर अधिग्रहणबीड २४गेवराई १०वडवणी ५शिरूरकासार ८पाटोदा २अंबाजोगाई ३८केज २२परळी २धारूर २०माजलगाव ८एकूण १४३

टॅग्स :Waterपाणीbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४