शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शेतकरी मित्र असो की पुत्र; नेत्यांनो चारा, पाण्यासाठी कधी बोलणार?

By सोमनाथ खताळ | Updated: April 9, 2024 19:07 IST

पीपल्स मॅनिफेस्टो: शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संताप : उमेदवारांसह राजकीय नेते केवळ प्रचारातच व्यस्त

बीड : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एप्रिल महिन्यातच १२२ गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार आणि नेतेमंडळी व्यस्त आहे. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार, असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.

जिल्ह्यात गावे, वाड्यावस्त्यांची संख्या ही दीड हजारांच्या घरात आहे. लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील छोटे-मोठे प्रकल्प कोरडेठाक पडत आहेत. सद्यस्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १२२ गावांत एप्रिलमध्येच टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार? याची चिंता सर्वांनाच आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमाेल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त आहे.

प्रशासन म्हणतेय १९२ दिवस पुरेल चाराजिल्ह्यात लहान, मोठे, शेळी, मेंढ्या असे १३ लाखांच्या घरात पशुधन आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन ३ किलो, तर मोठ्यांसाठी ६ किलो चारा लागतो. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही १९२ दिवस चारा पुरेल असा दावा प्रशासनाने केला आहे. असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागात चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे.

जिल्ह्यात १४४ टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच १२२ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात आणखी टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विहीर, बोअर अधिग्रहण केले जात आहे. आतापर्यंत १४३ जलस्त्रोत अधिगृहीत केले आहेत.

हा पाण्याचा अपव्यय कधी थांबवणार?जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत असतानाही आजही काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर आदी ठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही जागोजागी लिकेज झाल्या आहेत. यामुळेही लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

आवश्यक उपाययोजना तातडीने करादुष्काळजन्य परिस्थितीत पिण्याचे पाणी, चारा, ऊसतोड मजुरांना रेशन यांसह आवश्यक उपाययोजना तातडीने कार्यान्वित करा, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी केली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रशासन स्तरावर बैठका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मुंडे यांनी दुष्काळ उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्याचे सांगण्यात आले.

अशी आहे आकडेवारीजलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा शिल्लक- १६ टक्केबोअर व विहिरी अधिग्रहित - १४३

कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरूबीड ६०गेवराई ५९शिरूर ६पाटोदा ४आष्टी ९परळी ५धारूर १एकूण १४४

बोअर, विहीर अधिग्रहणबीड २४गेवराई १०वडवणी ५शिरूरकासार ८पाटोदा २अंबाजोगाई ३८केज २२परळी २धारूर २०माजलगाव ८एकूण १४३

टॅग्स :Waterपाणीbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४