शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

सत्ता कधी असते, कधी नसते; पण सत्ता, पद गेले की अनेकांचा चेहरा पडतो: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:02 IST

गेवराईत शिवाजीराव पंडित अभीष्टचिंतन सोहळा

- सखाराम शिंदेगेवराई (जि. बीड) : सत्ता कधी असते, कधी नसते. पण सत्ता, पद गेले की काहींचा चेहरा पडतो. परंतु शिवाजीराव पंडित यांचे तसे नाही. त्यांनी बीड जिल्ह्यात अनेक पदे भोगली. ४० वर्षे जनतेला भरभरून दिले. सेवाभावी वृत्तीने काम केले. ही बीड जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. स्वत:हून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. यानंतरही ते शेतीत रमले. राजकारणात पंडित घराण्याचा मोठा वारसा आहे. यामुळे आगामी काळात त्यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.

गेवराई येथे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळा रविवारी (९ ऑक्टोबर) पार पडला. यावेळी शिवाजीराव पंडित यांचा खासदार शरद पवार, मंत्री रावसाहेब दानवे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते. आज आनंदाने या सोहळ्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. बीडमध्ये १९८० मध्ये एखादी जागा सोडली तर माझ्या सर्व जागा निवडून आल्या होत्या. आज सुंदरराव सोळंके, गोविंदराव डक, बाबूराव आडसकर आपल्यात नाहीत. त्या काळात त्यांनी माझ्याबरोबर काम केले. या मंडळींनी राज्याच्या राजकारणात मला मनापासून साथ दिली. त्यात एक महत्त्वाची व्यक्ती शिवाजीराव पंडित हेही होते. १९८५ मध्ये शिवाजीराव पंडित यांच्यावर जिल्हा परिषदेची जबाबदारी टाकली होती. ती त्यांनी पेलली. त्या काळात दुष्काळ होता. त्यात सर्वात आधी बीडचे नाव असायचे. दुष्काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मदत केली. जायकवाडीचे पाणी गेवराईला आणले, असे पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री संदीपान भुमरे, राजेश टोपे, श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

एकदा ठरविले की बीडकर ते पूर्ण करतातगेवराईत शिवाजीराव पंडित यांनी जयभवानी सहकारी साखर कारखाना उभा केला. शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले. आजही शेतीतून काळ्या आईची सेवा करीत आहेत याचा मला आनंद आहे. बीडचे वैशिष्ट्य असे आहे की एकदा ठरविले की ती गोष्ट येथील लोक पूर्ण करतात, असेही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBeedबीड