शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

वॉटरग्रीड म्हणजे कोरडी नदी जोडून ‘खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम - देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:50 AM

वॉटर ग्रीड म्हणजे ‘कोरड्या नदया जोडण्याचा खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम आहे. महाराष्टÑ दुष्काळ निवारण मंडळाच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरु केल्याचे प्रा. देसरडा यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वॉटर ग्रीड म्हणजे ‘कोरड्या नदया जोडण्याचा खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम आहे. ऊस, कापूस पीक वाटोळे करणारे आहे. विविध योजनांच्या नावाखाली मनी हार्वेस्टिंग सुरु असल्याची टीका राज्याच्या अर्थ व नियोजन मंडळाचे सदस्य तथा अर्थ व जलतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी केली. महाराष्टÑाचे चित्र भेसूर, अस्वस्थ करणारे होत असल्याने वसुंधरा बचाओ, मानव बचाओ, किसान बचाओचा नारा देत महाराष्टÑ दुष्काळ निवारण मंडळाच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरु केल्याचे प्रा. देसरडा यांनी सांगितले.वॉटर ग्रीड आणि जनजागृती अभियानाच्या पार्श्वभूमीवर बीड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यवस्थेवर सडकून टीका केली. अशा परिस्थितीत पाच लाख डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याची सरकारने घोषणा केली आहे. यात महाराष्टÑाची एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्था करायची आहे. सध्या महाराष्टÑाची अर्थव्यवस्था पाहता तिप्पट करता येणार आहे काय? , आधी लघु पाणलोट क्षेत्र विकास होती त्याचे केवळ नाव बदलून जलयुक्त शिवार योजना २०१४ साली जाहीर केली. २५ हजार गावांत ५ लाख कामे केली. यावर सरकार आणि सीएसआरमधून दहा हजार कोटी खर्च केले. यातून ३४ लाख हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झाल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र १९६० नंतरही ९० टक्के भूजलावर सिंचनक्षेत्र अवलंबून आहे. त्यामुळे या दाव्याला आधार नसल्याचे प्रा. देसरडा म्हणाले. सरकारकडून सांगितले जाणारे आकडे आणि सद्यस्थिती वेगळी तसेच विदारक असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ व टंचाईत राबविलेल्या योजना कागदावर सुरु आहे. राज्यात फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर साडेपाच हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे राबविलेल्या योजनांचा ताळमेळ बसत नाही. सरकारने ५० हजार कोटी रुपये विविध योजनांवर खर्च केले. जर कामे झाली असतील तर शेतकरी आत्महत्या का करत आहे? असा सवाल प्रा. देसरडा यांनी केला. अर्थकारणाच्या निकषांवर सरकारचे दावे टिकत नाहीत मानव विकासातही महाराष्टÑ मागे आहे. ग्रामीण भाग बकाल होत आहे तर शहरे बेबंद आहेत. सरकारचे दावे, घोषणा पोकळ असून अशा वल्गना यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या असे ते म्हणाले.पाऊस हुलकावणी देतं, सरकार दगा देतं, वॉटर ग्रीड, समृद्धी, नदी जोड अशा वावटळी घोषणा करतं. विकास हा मुलत: राजकारण असते, परंतू सध्या मात्र राजकीय लुडबुड होत आहे. पुढारी आता पेंढारी झाले आहेत. १९७२ पासून भूगर्भातील पाणी आणि माणुसकी आम्ही दोन्ही घालवलंय. परिणामी एकीकडे अवर्षणाचे चटके तर दुसरीकडे लोक पाण्यात बुडाले. याला शासन व्यवस्था कारणीभूत असून याकडे समाजाने लक्ष घालावे, असे देसरडा म्हणाले.बालाघाट रिजनरेट केले तरी पुरेसेकोरड्याला कोरडे जोडल्याने काय होईल? औरंगाबादचे भागले म्हणजे मराठवाड्याचे भागणार आहे का? बालाघाट रिजनरेट केले तर बीड , उस्मानाबादचा प्रश्न सुटू शकतो, ग्रीड ही केवळ लालस आहे. कमी पाऊस होऊनही पुरेसं पाणी मिळतं, परंतू साधन साक्षरता नाही, सामाजिक न्याय नाही, जनावरं- शेतीचे नाते संपले आहे. इथला विकास रोजगार विहिन बनला असून प्रस्थापित वर्ग बोकड कमाईत गुंतल्याची टीका प्रा. देसरडा यांनी केली.नेता, बाबू, थैला संस्कृती वाढलीराज्यातील हे विकार आणि संकटे अस्मानी कमी आणि सुलतानी जास्त आहे. सांगली कोल्हापूरचे संकट मुख्यत: मानव निर्मित आहेत. याला कारणीभूत व्यवस्था आहे. लोकांना फक्त आकाशाकडे हे दाखवून किंवा येईल असे सांगून दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले. नेता, बाबू, थैला संस्कृती वाढली आहे. विकास, तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या नावाने चाललेली पांजरपोळे लूट करत आहेत. करे कोई, भरे कोई यात श्रीमंत हा श्रीमंत तर गरीब गरीबच होत चालला आहे. सध्याच्या किंवा आधीच्या सरकारबद्दल आपला आकस नसून मराठवाड्याचे दुष्काळी चित्र बदलण्याची गरज असून जनतेने विचार करावा, असे प्रा. देसरडा म्हणाले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाgovernment schemeसरकारी योजनाCorruptionभ्रष्टाचारWaterपाणीdroughtदुष्काळ