शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

२०१८ च्या लोकसंख्येआधारे टॅँकरने पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:13 IST

पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश : आॅडिओ ब्रिजद्वारे बीड जिल्ह्यातील सरपंचांशी साधला संवाद

बीड : पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.गुरुवारी वर्षा निवासस्थानातून आॅडिओ ब्रिजच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्याशी दुष्काळी उपाययोजने संदर्भात संवाद साधला.मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी-रोहयोची कामे, तातडीच्या पाणी पुरवठा योजनांसाठी निवडणूक आचारसंहितेचा अडथळा नसून अधिकाऱ्यांनी विविध आवश्यक कामांना तातडीने मंजुरी द्यावी. अशा कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही ते म्हणाले. या बैठकीला मुख्य सचिव यु. पी. एस. मदान,पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंधारण व रोहयोचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.४ लाख १८ हजार जनावरेजिल्ह्यात एकूण ८५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. जिल्ह्यात ९ नळपाणी पुरवठा योजनांची दुरु स्ती, ११ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व ९०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची ९७.९९ लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम भरण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.जिल्ह्यातील ११ तालुक्यात ६०० शासकीय चारा छावण्या सुरु आहेत. त्यामध्ये ३ लाख ८७ हजार ६१६ मोठी तर ३१ हजार २११ लहान अशी एकूण ४ लाख १८ हजार ८२७ जनावरे दाखल आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व ११ तालुक्यातील दुष्काळग्रस्त १४०२ गावातील ७ लाख ८४ हजार १४३ शेतकऱ्यांना ४२८.३९ कोटी रु पयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सरपंचांनी मांडल्या अडचणीबीड जिल्ह्यातील अर्जुन शेंडगे, हरिभाऊ पवार, परमेश्वर राठोड, श्रीराम काकडे, तानाजी खामकर, संजय थोट, मनोहर खोमणे, जयसिंग नरवडे, विश्वनाथ घुले, उत्तम फड, भाऊसाहेब अवताडे,भगवान चोरमले तसेच वंदना काटे, रेश्मा तोडकर, संगीता पाटील, छाया कवाडे, प्रियंका काशीद, दिपा शिरसाठ, किर्ती चव्हाण, पल्लवी भुते, तारामती माने, सखुबाई सोनवणे,सुनीता जायभाय, सरीता सानप या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क करुन आपल्या अडचणी मांडल्या.तक्रारींवर तातडीने कार्यवाही करागावासाठी जादा पाणी टँकर सुरु करणे,नव्याने टँकर सुरु करणे,विहिरींची दुरु स्ती करणे,पाण्याच्या टाकीची दुरु स्ती करणे, तलाव दुरु स्ती, नव्याने चारा छावण्या सुरु करणे,चारा छावण्यांची संख्या वाढविणे,रोहयोची कामे सुरु करणे, रोहयो कामाचे पैसे देणे, नळ पाणी पुरवठा योजनेच्या किरकोळ दुरु स्तींना तातडीने मंजुरी देणे अशा अनेक मागण्या यावेळी सरपंचांनी केल्या. या तक्र ारींवर तातडीने कार्यवाही करु न अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार,गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

टॅग्स :BeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळsarpanchसरपंच