शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

२०१८ च्या लोकसंख्येआधारे टॅँकरने पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:13 IST

पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश : आॅडिओ ब्रिजद्वारे बीड जिल्ह्यातील सरपंचांशी साधला संवाद

बीड : पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.गुरुवारी वर्षा निवासस्थानातून आॅडिओ ब्रिजच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्याशी दुष्काळी उपाययोजने संदर्भात संवाद साधला.मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी-रोहयोची कामे, तातडीच्या पाणी पुरवठा योजनांसाठी निवडणूक आचारसंहितेचा अडथळा नसून अधिकाऱ्यांनी विविध आवश्यक कामांना तातडीने मंजुरी द्यावी. अशा कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही ते म्हणाले. या बैठकीला मुख्य सचिव यु. पी. एस. मदान,पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंधारण व रोहयोचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.४ लाख १८ हजार जनावरेजिल्ह्यात एकूण ८५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. जिल्ह्यात ९ नळपाणी पुरवठा योजनांची दुरु स्ती, ११ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व ९०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची ९७.९९ लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम भरण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.जिल्ह्यातील ११ तालुक्यात ६०० शासकीय चारा छावण्या सुरु आहेत. त्यामध्ये ३ लाख ८७ हजार ६१६ मोठी तर ३१ हजार २११ लहान अशी एकूण ४ लाख १८ हजार ८२७ जनावरे दाखल आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व ११ तालुक्यातील दुष्काळग्रस्त १४०२ गावातील ७ लाख ८४ हजार १४३ शेतकऱ्यांना ४२८.३९ कोटी रु पयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सरपंचांनी मांडल्या अडचणीबीड जिल्ह्यातील अर्जुन शेंडगे, हरिभाऊ पवार, परमेश्वर राठोड, श्रीराम काकडे, तानाजी खामकर, संजय थोट, मनोहर खोमणे, जयसिंग नरवडे, विश्वनाथ घुले, उत्तम फड, भाऊसाहेब अवताडे,भगवान चोरमले तसेच वंदना काटे, रेश्मा तोडकर, संगीता पाटील, छाया कवाडे, प्रियंका काशीद, दिपा शिरसाठ, किर्ती चव्हाण, पल्लवी भुते, तारामती माने, सखुबाई सोनवणे,सुनीता जायभाय, सरीता सानप या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क करुन आपल्या अडचणी मांडल्या.तक्रारींवर तातडीने कार्यवाही करागावासाठी जादा पाणी टँकर सुरु करणे,नव्याने टँकर सुरु करणे,विहिरींची दुरु स्ती करणे,पाण्याच्या टाकीची दुरु स्ती करणे, तलाव दुरु स्ती, नव्याने चारा छावण्या सुरु करणे,चारा छावण्यांची संख्या वाढविणे,रोहयोची कामे सुरु करणे, रोहयो कामाचे पैसे देणे, नळ पाणी पुरवठा योजनेच्या किरकोळ दुरु स्तींना तातडीने मंजुरी देणे अशा अनेक मागण्या यावेळी सरपंचांनी केल्या. या तक्र ारींवर तातडीने कार्यवाही करु न अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार,गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

टॅग्स :BeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळsarpanchसरपंच