शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

बीड शहरात दूषित पाणीपुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:23 IST

बीड शहरातील काही भागांत दोन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहेत. सांडपाणी म्हणून वापरात आणण्या एवढेही पाणी शुद्ध नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून बीडकर विकतच्या पाण्यावर तहान भागवित असून तात्काळ उपाययोजना करण्यात बीड पालिका अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे.

ठळक मुद्देविकतचे पाणी घेऊन भागविली तहान

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील काही भागांत दोन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहेत. सांडपाणी म्हणून वापरात आणण्या एवढेही पाणी शुद्ध नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून बीडकर विकतच्या पाण्यावर तहान भागवित असून तात्काळ उपाययोजना करण्यात बीड पालिका अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे.

बीड शहराला माजलगाव व बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. वीज बिल थकल्यामुळे महावितरणने दोन्ही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला. चार दिवसानंतर वीज भरले आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला. पाणी जरी आले असले तरी ज्या ठिकाणाहून पाणी ओढले जाते, त्याठिकाणी घाण झाली होती. तसेच जलवाहिनीही दूषित झाली होती. याचा जलवाहिनीतून पुन्हा पाणीपुरवठा झाल्याने शहरातील पिंपरगव्हाण रोड, भक्ती कन्स्ट्रक्शन, अंबिका चौक भाग अशा अनेक ठिकाणी दूषित पाणी आले. पाण्याची दुर्गंधी सुटली होती. हे पाणी सांडपाणी म्हणूनही वापरण्यास योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकावयास मिळाल्या.

दरम्यान, पालिकेने सध्या जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाऊले उचलल्याचे सांगण्यात आले. तरीही आणखी किमान दोन दिवस सर्व जलवाहिनी स्वच्छ होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसात ज्या भागात पाणी आले आहे, त्यांच्यामधून पालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाणीपुरवठा अभियंता निखिल नवले म्हणाले, पाणीपुरवठा बंद असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. नागरिकांनी घाबरू नये. पालिका प्रयत्न करीत आहे.आरोग्यास धोकादूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्वचा व इतर आजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीMarathwadaमराठवाडाHealthआरोग्य