शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'जलयुक्त' नंतर ‘जलशक्ती’मुळे मिळणार बीड जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 1:23 PM

केंद्र सरकार ‘जलशक्ती’ हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवणार  

ठळक मुद्दे‘मन की बात’ कार्यक्रमात बीडचा उल्लेख महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा समावेश 

- प्रभात बुडूख 

बीड : जिह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाच्या व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जलसंधारणाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘जलशक्ती’ हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवला जाणार असून, यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 

‘जलशक्ती’ योजनेद्वारे पाणी बचत व जलपुनर्भरण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन पारंपरिक पाण्याच्या स्त्रोत जिवंत करणे तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे पाणी एकत्र करुन जल पुनर्भरण करण्यात येणार आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबवला जाणार असून राज्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

राज्य शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार योजना अतिशय प्रभावीपणे जिल्ह्यात राबवण्यात आली आहे. या योजनेचा परिणाम देखील चांगला दिसून आला आहे. तसेच पाणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमुळे त्या परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जलयुक्त योजनेच्या धरतीवर केंद्राच्या ‘जलशक्ती’ योजनेचा समावेश झाल्यामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना गती मिळणार आहे. 

‘मन की बात’ कार्यक्रमात बीडचा उल्लेख जलशक्ती योजनेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये माहिती दिली. यावेळी हा कार्यक्रम देशभरात राबवला जाणार असून, महाराष्ट्रातील ८ जिल्ह्याचा समावेश आहे. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला व हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवल्यावर जिल्ह्यातील दुष्काळावर मात करता येऊ शकते असे देखील ते यावेळी म्हणाले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. 

जिल्हा प्रशासन लागले कामालाकेंद्र शासनाचा कार्यक्रम असल्यामुळे जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, जलसंधारण तसेच संबंधीत सर्व विभागत योजनेचा शुभारंभ करण्यापुर्वी करण्यात येणाऱ्या तयारीला लागले असल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांचा समावेश जलशक्ती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, बीड, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

टॅग्स :WaterपाणीCentral Governmentकेंद्र सरकारBeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवार