शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या, देशमुख हत्या प्रकरणी विष्णू चाटेने थेट कबुलीच दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:24 IST

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Walmik Karad ( Marathi News )  : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी तपास सुरू केला आहे. वाल्मीक कराड याला १५ दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली आहे. तर विष्णू चाटे याचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, कोठडीमध्ये असलेल्या विष्णू चाटे याने काल पोलिसांजवळ मोठी कबुली दिली आहे. पवनचक्की कंपनीला दोन कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी चाटे याने कबुली दिली. यामुळे आता वाल्मीक कराड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

CM देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि‍पदाचा शब्द दिला आहे का?; छगन भुजबळ म्हणाले,“मला सांगितले की...”

वाल्मीक कराड याने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली विष्णू चाटे याने चौकशीत दिली आहे. विष्णू चाटे याच्या मोबाईलवरुन पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते. दरम्यान, आता विष्णू चाटेने याबाबत कबुली दिली आहे. याबाबतचा अहवाल सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. 

३१ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराड याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. त्याच दिवशी रात्री न्यायालयाने त्याला १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. पहिले दोन दिवस कराड याने जोवण घेण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी आगृह केल्यानंतर त्याने जेवण केले. दरम्यान, आता सीआयडी अधिकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अन्य आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केली आहे. राज्या शेजारी असणाऱ्या रोज्यात ही पथके पाठवण्यात आली आहेत. आरोपीजवळ मोबाईल नसल्यामुळे शोधण्यात अडचणी येत आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे'

बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर लोकांचा रोष आहे. लक्षात घेतला पाहिजे. वाईट पद्धतीने हत्या झाली आहे. या घटनेत कोणालाही पाठीशी न घालता दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे. एखाद्या मंत्र्यामुळे चौकशीला अडथळा येत असेल तर त्या दृष्टीने योग्य ती पाउलं उचलली पाहिजेत, असंही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

"निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा आहे. पोलिस ठाण्यात बेड का आले आहेत? याची चौकशी केली पाहिजे. गुन्हेगारांना व्हिआयपी ट्रिटमेंट बाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे, असं कोल्हे म्हणाले.  

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस