शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मतदारांना विकास हवा असतो; चूक झाल्यास विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:02 AM

मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : पाणी, वीज, रस्त्यांसाठी प्रयत्न राहणार

बीड : लोकशाहीत मते मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. विकासाच्या मुद्यावर कुणी मत मागत नाही तर पोरखेळ वृत्तीने झिरो असणारे हिरो होण्याचा प्रयत्न करतात. मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. मंगळवारी सायंकाळी बार्शी नाका, परिसरात जाहीर सभेत ते बोलत होते.बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव म्हणाले की, एक अभ्यासू व विचारसंपन्न नेतृत्व म्हणून अण्णांना निवडून द्या. सर्व सामाजातील मतदार अण्णांवर खुल्या मनाने प्रेम करतो. जयदत्त क्षीरसागर यांना मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सरकारच्या योजना आणून राबवण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करावा लागतो. पाणी, वीज, सडक या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी निधी उपलब्ध करुन ही कामे होत असल्याचे ते म्हणाले.या वेळी बार्शीनाका, अशोक नगर, इमामपूर रोड परिसरातील शिवसैनिक, महिला, नागरिक, युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनिल जगताप, प्रा.जगदीश काळे, बप्पासाहेब घुगे, बाळासाहेब आंबुरे, नितीन धांडे, सुशील पिंगळे, गोरख शिंगन, संजय उडान, लक्ष्मण विटकर, सागर बहीर, भगीरथ बियाणी, सर्जेराव तांदळे, दिनकर कदम, विलास बडगे, सुनील सुरवसे, सुधीर भांडवले आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.मित्रनगर, दत्तनगर, चाणक्यपुरी परिसरात कॉर्नर बैठकबीड : शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवर जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी मित्रनगर, दत्तनगर, चाणक्यपुरी, शिवाजीनगर परिसरात कॉर्नर बैठक झाली. यावेळी सर्जेराव तांदळे म्हणाले की, राष्ट्रवादीने महिला उमेदवार दिला नाही, सर्वच क्षेत्रात महिलांना प्राधान्य द्यायला हवे, पण त्यांना महिलांचे महत्त्व वाढवायचे नव्हते. आम्ही बीड जिल्ह्यात दोन जागांवर महिला उमेदवार निवडणार आहोत.विनोद मुळूक म्हणाले, अण्णांच्या व अध्यक्षांच्या पाठपुराव्यामुळे शहरातली कामे चालू आहेत. ती भविष्यासाठी बीडकरांना मोकळा श्वास देणारी ठरणार आहेत. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीडची पुढची दिशा काय असावी, बीड कसं असावं याचा विचार महत्त्वाचा आहे. शहराचे आणि समाजाचे हित कशात आहे, हे बीडचा मतदार चांगले ओळखतो. त्यामुळे आम्हाला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना