शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

‘विठ्ठलाचा भार आता या विटेला वाटतो !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:26 PM

मल्हारीकांत देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : भगवानराव लोमटे सभागृहात डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गझल संमेलनाला ...

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य संमेलनात प्रथमच गझलकारांच्या रचनांनी तरुणाईला भरती

मल्हारीकांत देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : भगवानराव लोमटे सभागृहात डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गझल संमेलनाला युवा महोत्सवाचेच स्वरूप प्राप्त झाले होते. सळसळती तरुणाई व दर्जेदार झालेले सादरीकरण यामुळे गझलनगरीत पाय ठेवायला जागा राहिली नव्हती. रसिकांची गर्दी खेचणारा कार्यक्रम म्हणून या संमेलनाने नोंद घ्यावी, अशी एकंदर परिस्थिती निर्माण झाली होती. साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच मराठी गझलला व्यासपीठ मिळाल्यामुळे तरुण गझलकारांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. श्रोत्यांमध्ये तरुणींसह महिलांची उपस्थिती व सहभाग हे या गझल संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.लातूर येथील प्रा. संतोष कुलकर्णी यांची‘मराठी गझल पुढे जात आहे,मराठीसही ती पुढे नेते आहे’गझलेला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.दास पाटील, योगिता पाटील यांच्याही गझला उत्तम होत्या. नांदेड येथील प्रफुल्ल कुलकर्णी यांनी‘मोठ्याला मोठे म्हणण्याला धीर हवागुन्हा नको, आरोप तरी गंभीर हवा’हा शेर सादर करीत दाद मिळविली. सुहासिनी देशमुख यांनी‘तुझ्या भोवती खुळा पाश आहेक्षणाचा विसावा पुन्हा नाश आहेनको दोन डगरींवर पाय आताअशा वागण्यात पुरा नाश आहे...’ही गझल सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.सेलू येथील संजय विटेकरांनी,‘वयाने जरासा ढळू लागलोतसा मी मला कळू लागलो...’ही गझल सादर केली. उदगीर येथील शिव डोईजोडे या युवकानेती डोळ्याने बोलत गेलीमी नंतर भाषांतर केलेरंगत आली कथा नेमकीउगीच का मध्यंतर झाले...म्हणताच उपस्थित युवांनी जल्लोष केला.कळंब येथील सचिन क्षीरसागर यांनी‘युगायुगांचा त्रास हाटिपेला गेला वाटतोविठ्ठलाचा भार या विटेला वाटतो’ही मार्मिक गझल ऐकवली.प्रा. शेखर गिरी यांनी,दाबून तोंड माझे, पाठीत वार झालामजला छळावयाचाऐसा प्रकार झालामाझी तशी सुपारीकोणीच घेत नव्हतेमाझाच दोस्त सालातेव्हा तयार झाला’अशी कोटी सादर केली.उस्मानाबाद येथील बाळ पाटील या युवकाच्या‘हसू वाटते, पण हसू देत नाहीजखम ही ‘मुळाची’ बसू देत नाहीसदा काश्मिराचा नकाशा मुखावरकधी तो खुशाली असू देत नाही’या व्यंगात्मक गझलेने उपस्थितांची हसून हसून मुरकुंडी उडालीनांदेड येथील अरविंद सगर या युवकाने,‘गळी लागला तो विषारी निघालातिचा चेहराही शिकारी निघालाआता माकडाचे बघून सर्व चाळेदिली ज्या सत्ता, तो मदारी निघाला’हे राजकीय व्यंग गझलेतून मांडले.रवींद्र केसकर या गझलकाराने‘कोणी गुलाम झाला,कोणी ‘आमिर’ झालाज्याला न जात काही,तो कबीर झाला’असे सामाजिक आशयाचे शेर सादर केले.बडवणी येथील सतीश दराडे यांनी,आतल्या कोलाहलाला,बांग देता येत नाहीगाढ निद्रेतून हल्ली,जाग येता येत नाही’अशी गझल सादर केली.वैभव देशमुख या युवकाने,‘संबंध कधी मी आपला,कुणाला सांगत नाहीगंध तुझ्या प्रेमाचा,या उरात मावत नाहीसूर्याभोवती फिरती ही धरा,किती युगांचीहा सूर्य मिठी एखादीका देऊन टाकीत नाही’अशी शृंगारिक रचना सादर केली.राज पठाण, प्रथमेश तुगावकर, विजय आव्हाड, योगीराज माने यांच्या गझलांना उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.गझल संमेलनाची सांगता औरंगाबाद येथील डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या‘बोलतो मराठी, ऐकतो मराठीहीच माय माझी, मानतो मराठीजन्मलो येथे मी भारतीय मुस्लिमरोज रोज मी दुवाही मागतो मराठी’या गझलेने कार्यक्रमाची सांगता झाली.

सचिन क्षीरसागर ठरला हिरोकळंब येथील अल्पशिक्षित सचिन क्षीरसागर हा युवक उदरनिर्वाहासाठी पानटपरी चालवितो. या युवकाचे सादरीकरण उपस्थितांना मनोमन भावले. राजकीय व्यंग टिपताना तो म्हणतो,चालते फुरफुर कुणाची, तर कुणी खिंकाळतोसंसदेचा हॉल आज घोड्याचा तबेला वाटतोजातिधर्माचे वाढतो स्तोम व्यक्त करताना त्याच्या ओळी लक्षणीय होत्या...लटकतो खोपा कुठे, कुठे हिरवा कुठे भगवा, निळापाखरांनी आज जातीवाद केला वाटतो’सचिनच्या प्रभावी सादरीकरणामुळे तो गझल संमेलनाचा ‘हिरो’ ठरला.

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन