शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तहसिलदांराची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 13:36 IST

कामात पारदर्शकता आल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळत असल्याची भावना येथील नागरिकांची आहे.

कडा ( बीड ) : तहसीलदार राजाभाऊ कदम यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी नागरिकांनी सकाळी ११ वाजता नगर-जामखेड-बीड राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. 

राजाभाऊ कदम हे मागील वर्षापासून आष्टी तहसीलदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कामात पारदर्शकता आल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळत असल्याची भावना येथील नागरिकांची आहे. दरम्यान, तहसीलदार कदम यांची नुकतीच आष्टी येथून देगलूर येथे बदली करण्यात आली आहे. बदली रद्द् करण्यासाठी टाकळी अमिया, रूईनालकोल, सराटेवडगांव, कडा येथील नागरिकांनी रास्तारोको केला. या आंदोलनात अनिल ढोबळे, प्रा. राम बोडखे, सावता ससाणे, संजय नालकोल, रहेमान सय्यद, किशोर घोडके, बाबासाहेब शिरोळे, विष्णु निंबाळकर आदी ग्रामस्थ सहभागी होते. 

यावेळी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब राख, बंडु दुधाळ, मंगेश मिसाळ, मंडळ अधिकारी प्रियंका घोडके, तलाठी नवनाथ औदकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला. यावेळी टाकळी अमिया रस्ता येथे पहिली ते पदवी असे महाविद्यालय सुरू करावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :agitationआंदोलनBeedबीड