शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:54 IST

अनधिकृत दर्जाहीन बियाणे कीटकनाशके, खते शेतक-यास विक्री केले तर त्याचे पिकाचे नुकसान होते याची झळ त्याच्या कुटुंबाला देखील बसते त्यामुळे शेतकºयांचे शोषण करुन फायदा साधणा-या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करु असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.

ठळक मुद्देखरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा विक्रेता कार्यशाळा : नियमबाह्य बाबींची जबाबदारी राहणार कृषी अधिका-यांची

बीड : शेतकरी हा जिल्ह्यातील विकासाचा केंद्रबिंदू आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी निविष्ठा विकणारे विक्रेते यांच्या तो सतत संपर्कात असतो. त्याला योग्य मार्गदर्शन केले तर फायदा होऊ शकतो, परंतु स्वत:च्या फायद्यासाठी अनधिकृत दर्जाहीन बियाणे कीटकनाशके, खते शेतक-यास विक्री केले तर त्याचे पिकाचे नुकसान होते याची झळ त्याच्या कुटुंबाला देखील बसते त्यामुळे शेतकºयांचे शोषण करुन फायदा साधणा-या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करु असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व कृषी सेवा केंद्र बियाणे व खातांचे मुख्य विक्रेत्यांची कार्यशाळा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयत संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र निकम, संगीता पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक बी.एम. गायकवाड, कागदे, कृषी निविष्ठा विक्रेता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, जिल्हाध्यक्ष सत्यनारायण कासट यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी जिल्हा पातळीवर खरीप हंगामपूर्व तयारीबाबत कृषी विभाग करत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच कृषी निविष्ठा विक्रेता यांच्यामार्फत शेतकºयांना आवश्यक माहिती पोहोचावी, यासाठी विविध तज्ञांचे मार्गदर्शन दिले असे निकम म्हणाले. कार्यशाळेसाठी कृषी निविष्ठा विक्रेते, तालुका कृषी अधिकारी, कृषी व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.कृषी सेवा केंद्र चालकांना आवाहनबोंडअळी निर्मुलनासाठी चोरबीटीची विक्री कृषी सेवा केंद्र चालकांनी करु नये. तसेच प्रशासनाने बंदी घातलेले खते, बियाणे विक्रीसाठी ठेवू नयेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.तालुका स्तरावर पथके नेमून तपासणी करण्यात येत असून, खते-बियाणे संदर्भात गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल.फसवणूक टाळण्यासाठी जिल्हास्तरीय पथके नेमण्याचे आदेशजिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले,कृषी क्षेत्रामध्ये मोठे बदल होत आहेत, अशावेळी विक्रेत्यांनी दर्जेदार कृषी साहित्य विकावे.पाऊस पाणी, वातावरण ,नैसर्गिक आपत्ती यांच्याशी संघर्ष करून हा भूमिपुत्र अन्नधान्य पिकवत असतो. त्याच्याशी संवेदनशीलपणे वागणूक देऊन काम करावे.मिश्र खतांचे नियमबाह्य उत्पादन व विक्रीवर बंधने असून अशा घटनांमध्ये दोषी आढळणाºयांवर कारवाई केली जाईल असे पाण्डेय म्हणाले.रासायनिक खते व औषधे मानवी जिवनासाठी घातक असल्याने याबाबत शेतकºयांना माहिती देऊन जनाजागृती करावी.खते व कृषी निविष्ठांची विक्री करताना विविध खतांबरोबरच सेंद्रिय खते, बायोकंपोस्ट याचा वापर व माहिती देण्याकडे कल असावा.वजन, दर, दर्जा राखला जावा. फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा स्तरावरून पथके नेमावीत तसेच वजनाबद्दल तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र