भाजीपाला महाग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:48+5:302021-06-22T04:22:48+5:30

इंधन दरवाढीमुळे महागाई अनलॉकमुळे भाजी विक्रेते शहरात येत असले तरी गावापासून ते शहरात भाज्यांची वाहतूक दर वाढले आहेत. याला ...

Vegetables are expensive ... | भाजीपाला महाग...

भाजीपाला महाग...

इंधन दरवाढीमुळे महागाई

अनलॉकमुळे भाजी विक्रेते शहरात येत असले तरी गावापासून ते शहरात भाज्यांची वाहतूक दर वाढले आहेत. याला कारण इंधन दरवाढ आहे. यामुळेही शहरात भाज्यांचे दर वाढले आहेत.

-सखाराम शिंदे, भाजी विक्रेते.

...

आवक कमी झाली

गेल्या आठवड्यात सलग पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील भाजीपाला तोडता आला नाही. ज्यास्त पाऊस झाल्याने शेतात चिखलातून भाजी काढणे अवघड होते. परिणामी आवक मंदावली व भाव वाढले.

-शेख मोमीन, भाजी विक्रेते.

सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे. भाजीपाला लागवड करणे, तो जोपासणे ही कामे करताना रासायनिक खते, कीटकनाशके व मजुरीचे दर, इंधन दरवाढ यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या प्रमाणात भाजीपाल्याला भाव मिळत नाही.

- माउली ढगे, शेतकरी,

....

सगळीकडे भाववाढ चालते. मात्र, शेतकऱ्यांचा भाजीपाला १०, २० रुपयांनी महाग झाला की ओरड होते. लाख रुपये पगार घेणाऱ्या व्यक्तीलाही भाजी १० रुपयांत मिळावी, असेच वाटते. ही धारणा चुकीची आहे. शेतकऱ्यांनाही वाढत्या महागाईत चार पैसे मिळू द्या. त्यांचाही उदरनिर्वाह रस्त्यावर बसून होतो. ही जाणीव ठेवावी.

-सुरेश जगताप, शेतकरी.

...

अगोदरच सर्वत्र महागाई वाढलेली असताना भाजीपाला व फळे महाग झाली आहेत. सामान्य माणसाला हे वाढीव दर परवडणारे नाहीत. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

-अंकिता कुलकर्णी, गृहिणी.

....

कोरोनामुळे रोजगार बुडाले असून, वाढत्या महागाईचा सामना करणे अवघड बनले आहे. साधा वरण-भातही महागला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वसामान्यांचा किमान विचार करणे गरजेचे आहे. महागड्या भाज्या खरेदी करण्यापेक्षा आपले वरणच बरे.

-अर्चना धानोरकर, गृहिणी.

Web Title: Vegetables are expensive ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.