शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

अवकाळी पावसाच्या तडाख्याने ४ एकरवरील टरबूज सडले; नुकसानीने शेतकऱ्याचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:52 IST

टरबूज लागवड ते काढणीला येईपर्यंत लावलेले अडीज लाख रुपय पाण्यात गेले

- मधुकर सिरसटकेज : तालुक्यातील ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील सोनेसांगवी  येथील शेतकऱ्याने पावणे चार एकर जमिनीवर अडीच लाख रुपये खर्च करून टरबूजाचे पीक जोपासले होते. शेतकऱ्याने जीवलावून  मशागत केल्यामुळे 1 ते 5 किलोपर्यंत टरबूज पोसले होते. ऐन तोडणी करून टरबूज विक्रीच्या वेळीच  15 ते 20 दिवस अवकाळी पावसाने झड लावल्यामुळे सर्व टरबूज जागेवर सडल्याने जवळपास १० लाख रुपयांची हानी झाली आहे.

सोनेसांगवी येथील राजाभाऊ भाऊसाहेब कणसे यांनी आपल्या पावणे चार एकर जमिनीवर मार्च महिन्यात 50 हजार रुपये खर्च करून टरबूज पिकाची 21 हजार रोपांची लागवड केली. त्यानंतर खतांसाठी 60 हजार रुपये, एक लाख रुपयांची किटकनाशक फवारणी केली. वेलीला 1 ते 5 किलो वजनाचे टरबूज पोसले होते. मे महिन्यात पहिली तोडणी करून विक्री करण्याच्या वेळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. दररोज ढगाळ वातावरण आणि पावसाची झड 15 ते 20 दिवस राहिल्याने टरबूज वेलीपासून आपोआपच तुटून बाजूला होत जागेवरच सडले. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काहीच उत्पन्न पडले नाही. उलट लागवड, खत, फवारणीचा जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून 10 लाख रुपयांची हानी झाली आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजाभाऊ कणसे यांनी तहसीलदार यांचेकडे केली आहे. 

नुकसानीचा पंचनामाया नुकसानीची माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी सागर पटाडे यांचे मार्गदर्शना खाली कृषी सहाय्यक योगेश लामतुरे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी राजाभाऊ कणसे यांच्या  शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला आहे. यात त्यांच्या टरबूज पिकाची 100 टक्के नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

मुलाला कृषी दुकान टाकण्याचे स्वप्न भंगलेचांगले उत्पन्न मिळेल म्हणून अडीच लाख रुपये खर्च करून पावणे चार एकर  जमिनीवर टरबूजाचे पीक घेतले होते. ऐन तोडणीच्या वेळी अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. टरबूजाच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशावर मुलाला कृषी दुकान टाकून द्यायचे होते. आता कसे दुकान टाकून द्यायचे ? असा प्रश्न समोर असल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकरी राजाभाऊ कणसे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसBeedबीड