शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
3
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
4
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
5
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
6
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
7
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
8
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
9
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
10
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
11
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
12
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
13
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
14
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
15
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
17
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
18
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
19
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
20
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."

अवकाळी पावसाच्या तडाख्याने ४ एकरवरील टरबूज सडले; नुकसानीने शेतकऱ्याचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:52 IST

टरबूज लागवड ते काढणीला येईपर्यंत लावलेले अडीज लाख रुपय पाण्यात गेले

- मधुकर सिरसटकेज : तालुक्यातील ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील सोनेसांगवी  येथील शेतकऱ्याने पावणे चार एकर जमिनीवर अडीच लाख रुपये खर्च करून टरबूजाचे पीक जोपासले होते. शेतकऱ्याने जीवलावून  मशागत केल्यामुळे 1 ते 5 किलोपर्यंत टरबूज पोसले होते. ऐन तोडणी करून टरबूज विक्रीच्या वेळीच  15 ते 20 दिवस अवकाळी पावसाने झड लावल्यामुळे सर्व टरबूज जागेवर सडल्याने जवळपास १० लाख रुपयांची हानी झाली आहे.

सोनेसांगवी येथील राजाभाऊ भाऊसाहेब कणसे यांनी आपल्या पावणे चार एकर जमिनीवर मार्च महिन्यात 50 हजार रुपये खर्च करून टरबूज पिकाची 21 हजार रोपांची लागवड केली. त्यानंतर खतांसाठी 60 हजार रुपये, एक लाख रुपयांची किटकनाशक फवारणी केली. वेलीला 1 ते 5 किलो वजनाचे टरबूज पोसले होते. मे महिन्यात पहिली तोडणी करून विक्री करण्याच्या वेळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. दररोज ढगाळ वातावरण आणि पावसाची झड 15 ते 20 दिवस राहिल्याने टरबूज वेलीपासून आपोआपच तुटून बाजूला होत जागेवरच सडले. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काहीच उत्पन्न पडले नाही. उलट लागवड, खत, फवारणीचा जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून 10 लाख रुपयांची हानी झाली आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजाभाऊ कणसे यांनी तहसीलदार यांचेकडे केली आहे. 

नुकसानीचा पंचनामाया नुकसानीची माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी सागर पटाडे यांचे मार्गदर्शना खाली कृषी सहाय्यक योगेश लामतुरे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी राजाभाऊ कणसे यांच्या  शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला आहे. यात त्यांच्या टरबूज पिकाची 100 टक्के नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

मुलाला कृषी दुकान टाकण्याचे स्वप्न भंगलेचांगले उत्पन्न मिळेल म्हणून अडीच लाख रुपये खर्च करून पावणे चार एकर  जमिनीवर टरबूजाचे पीक घेतले होते. ऐन तोडणीच्या वेळी अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. टरबूजाच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशावर मुलाला कृषी दुकान टाकून द्यायचे होते. आता कसे दुकान टाकून द्यायचे ? असा प्रश्न समोर असल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकरी राजाभाऊ कणसे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसBeedबीड