शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत बारा दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

१० ते १२ दिवसाआड अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा खाजगी टँकर वाल्यांची चलती भर पावसाळ्यात पाणीटंचाई पावसाळ्यात टंचाईच्या झळा : विजेअभावी पंप ...

१० ते १२ दिवसाआड अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा

खाजगी टँकर वाल्यांची चलती

भर पावसाळ्यात पाणीटंचाई

पावसाळ्यात टंचाईच्या झळा : विजेअभावी पंप हाऊस बंदचा फटका

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराला आठवड्यातून किमान एकवेळ पाणीपुरवठा होतो. मात्र, या महिन्यात आठवड्यात होणारा पाणीपुरवठा आता १० ते १२ दिवसाआड होऊ लागल्याने शहराला पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत.

अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना आठवड्यातून किमान एकदा पाणीपुरवठा होतो. मात्र, या पाणीपुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगर परिषदेकडे नाही. जेव्हा पाण्याची टाकी भरेल तेव्हा त्या-त्या प्रभागात पाणी सोडले जाते. या महिन्यात आठवड्यात होणारा पाणीपुरवठा आता १० ते १२ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. परिणामी शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहर व परिसरात धो-धो पाऊस पडत असतानाही शहरातील नागरिकांना मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. अंबाजोगाई शहराला धनेगाव येथील मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण गेल्या वर्षी भरून वाहिले. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा गैरफायदा खासगी टँकरवाले घेत आहेत. ३०० लिटर पाण्यासाठी शहरवासीयांना दीडशे रुपये मोजावे लागतात, तरच पाणी विकत मिळते. वाढत्या पाणीटंचाईमुळे खाजगी टँकरवाल्यांची चलती सुरू आहे. परिणामी नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नगर परिषदेच्या वतीने जेव्हा पाणीपुरवठा केला जातो त्यासाठी कसलेही वेळापत्रक उपलब्ध नाही. अथवा पाणीपुरवठा करण्यासाठी विभागनिहाय ठराविक दिवस अथवा वेळ ठरवून दिली जात नसल्याने ज्या दिवशी पाणीपुरवठा होतो त्या दिवशी त्या कुटुंबातील व्यक्तीला आपले दैनंदिन व्यवहार सोडून नळाला पाणी कधी येईल, याची वाट पाहत बसावी लागते.

पाणीपुरवठा सुरळीत करावा

अंबाजोगाई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून शहरवासीयांना दिवस व वेळ ठरवून पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करण्यात यावे. पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा. ज्या परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे, त्या प्रभागात वीजपुरवठा सुरू असतानाच पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुभाष शिंदे यांनी केली आहे.

धनेगाव धरण परिसरात असणाऱ्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्याची दुरुस्ती झाली आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने धरणातील पंप हाऊस बंद राहिले. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता. परिणामी दोन दिवस पाणी सोडण्यासाठी उशीर झाला. आता सर्व प्रभागनिहाय पाणी दिले जात आहे.

अशोक साबळे, मुख्याधिकारी, नगर परिषद, अंबाजोगाई