शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

अंबाजोगाईत बारा दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

१० ते १२ दिवसाआड अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा खाजगी टँकर वाल्यांची चलती भर पावसाळ्यात पाणीटंचाई पावसाळ्यात टंचाईच्या झळा : विजेअभावी पंप ...

१० ते १२ दिवसाआड अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा

खाजगी टँकर वाल्यांची चलती

भर पावसाळ्यात पाणीटंचाई

पावसाळ्यात टंचाईच्या झळा : विजेअभावी पंप हाऊस बंदचा फटका

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराला आठवड्यातून किमान एकवेळ पाणीपुरवठा होतो. मात्र, या महिन्यात आठवड्यात होणारा पाणीपुरवठा आता १० ते १२ दिवसाआड होऊ लागल्याने शहराला पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत.

अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना आठवड्यातून किमान एकदा पाणीपुरवठा होतो. मात्र, या पाणीपुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगर परिषदेकडे नाही. जेव्हा पाण्याची टाकी भरेल तेव्हा त्या-त्या प्रभागात पाणी सोडले जाते. या महिन्यात आठवड्यात होणारा पाणीपुरवठा आता १० ते १२ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. परिणामी शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहर व परिसरात धो-धो पाऊस पडत असतानाही शहरातील नागरिकांना मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. अंबाजोगाई शहराला धनेगाव येथील मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण गेल्या वर्षी भरून वाहिले. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा गैरफायदा खासगी टँकरवाले घेत आहेत. ३०० लिटर पाण्यासाठी शहरवासीयांना दीडशे रुपये मोजावे लागतात, तरच पाणी विकत मिळते. वाढत्या पाणीटंचाईमुळे खाजगी टँकरवाल्यांची चलती सुरू आहे. परिणामी नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नगर परिषदेच्या वतीने जेव्हा पाणीपुरवठा केला जातो त्यासाठी कसलेही वेळापत्रक उपलब्ध नाही. अथवा पाणीपुरवठा करण्यासाठी विभागनिहाय ठराविक दिवस अथवा वेळ ठरवून दिली जात नसल्याने ज्या दिवशी पाणीपुरवठा होतो त्या दिवशी त्या कुटुंबातील व्यक्तीला आपले दैनंदिन व्यवहार सोडून नळाला पाणी कधी येईल, याची वाट पाहत बसावी लागते.

पाणीपुरवठा सुरळीत करावा

अंबाजोगाई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून शहरवासीयांना दिवस व वेळ ठरवून पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करण्यात यावे. पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा. ज्या परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे, त्या प्रभागात वीजपुरवठा सुरू असतानाच पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुभाष शिंदे यांनी केली आहे.

धनेगाव धरण परिसरात असणाऱ्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्याची दुरुस्ती झाली आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने धरणातील पंप हाऊस बंद राहिले. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता. परिणामी दोन दिवस पाणी सोडण्यासाठी उशीर झाला. आता सर्व प्रभागनिहाय पाणी दिले जात आहे.

अशोक साबळे, मुख्याधिकारी, नगर परिषद, अंबाजोगाई