शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अंबाजोगाईत बारा दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

१० ते १२ दिवसाआड अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा खाजगी टँकर वाल्यांची चलती भर पावसाळ्यात पाणीटंचाई पावसाळ्यात टंचाईच्या झळा : विजेअभावी पंप ...

१० ते १२ दिवसाआड अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा

खाजगी टँकर वाल्यांची चलती

भर पावसाळ्यात पाणीटंचाई

पावसाळ्यात टंचाईच्या झळा : विजेअभावी पंप हाऊस बंदचा फटका

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराला आठवड्यातून किमान एकवेळ पाणीपुरवठा होतो. मात्र, या महिन्यात आठवड्यात होणारा पाणीपुरवठा आता १० ते १२ दिवसाआड होऊ लागल्याने शहराला पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत.

अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना आठवड्यातून किमान एकदा पाणीपुरवठा होतो. मात्र, या पाणीपुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगर परिषदेकडे नाही. जेव्हा पाण्याची टाकी भरेल तेव्हा त्या-त्या प्रभागात पाणी सोडले जाते. या महिन्यात आठवड्यात होणारा पाणीपुरवठा आता १० ते १२ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. परिणामी शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहर व परिसरात धो-धो पाऊस पडत असतानाही शहरातील नागरिकांना मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. अंबाजोगाई शहराला धनेगाव येथील मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण गेल्या वर्षी भरून वाहिले. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा गैरफायदा खासगी टँकरवाले घेत आहेत. ३०० लिटर पाण्यासाठी शहरवासीयांना दीडशे रुपये मोजावे लागतात, तरच पाणी विकत मिळते. वाढत्या पाणीटंचाईमुळे खाजगी टँकरवाल्यांची चलती सुरू आहे. परिणामी नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नगर परिषदेच्या वतीने जेव्हा पाणीपुरवठा केला जातो त्यासाठी कसलेही वेळापत्रक उपलब्ध नाही. अथवा पाणीपुरवठा करण्यासाठी विभागनिहाय ठराविक दिवस अथवा वेळ ठरवून दिली जात नसल्याने ज्या दिवशी पाणीपुरवठा होतो त्या दिवशी त्या कुटुंबातील व्यक्तीला आपले दैनंदिन व्यवहार सोडून नळाला पाणी कधी येईल, याची वाट पाहत बसावी लागते.

पाणीपुरवठा सुरळीत करावा

अंबाजोगाई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून शहरवासीयांना दिवस व वेळ ठरवून पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करण्यात यावे. पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा. ज्या परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे, त्या प्रभागात वीजपुरवठा सुरू असतानाच पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुभाष शिंदे यांनी केली आहे.

धनेगाव धरण परिसरात असणाऱ्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्याची दुरुस्ती झाली आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने धरणातील पंप हाऊस बंद राहिले. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता. परिणामी दोन दिवस पाणी सोडण्यासाठी उशीर झाला. आता सर्व प्रभागनिहाय पाणी दिले जात आहे.

अशोक साबळे, मुख्याधिकारी, नगर परिषद, अंबाजोगाई