शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ट्रक-कारची धडक; चार वºहाडी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:12 IST

ट्रक व कारचा समोरासमोर जोराची झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील घटना : मयत बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील

बीड : ट्रक व कारचा समोरासमोर जोराची झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला. अंबाजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव येथील तरुणाच्या लग्नासाठी हे सर्व कपिलधारला आले होते. मृतात नवरदेवाच्या भावाचाही समावेश आहे. मयत हे बीडसह लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशीआहेत.अक्षय उर्फ आकाश रामलिंग गाढवे (३० रा. धानोरा, ता. अंबाजोगाई), सौरभ अरुण लोहारे (२२ रा. लातूर), ३) तेजस सुभाष गुजर (३२ रा. अंबाजोगाई), ४) मंगेश मल्लिकार्जुन कुंकुकरी (बार्शी जि. सोलापूर) अशी मयतांची नावे असून शुभम दत्तात्रय उंब्रे (रा. वानेवाडी ता. उस्मानाबाद) हे गंभीर जखमी आहेत. शुभम वगळता उर्वरित सर्व एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. तेजस गुजरच्या भावाचे रविवारी कपिलधार येथे लग्न असल्याने हे सर्व तिकडे गेलेले होते. काही कामानिमित्त हे पाच तरुण बीडला गेले होते. काम आटोपल्यानंतर ते पुन्हा कपीलधारच्या दिशेने जात होते. याचवेळी पाली जवळ मांजरसुंब्याकडून येणाऱ्या ट्रकची (एमएच ०९ सीए ०५९२) आणि कारची (एमएच ०२ एके २१११) समोरासमोर धडक झाली. यामध्ये कार ट्रकखाली आल्याने कारचा अक्षरश: चुराडा झाला. दोघे जण जागीच ठार झाले.अन्य जखमी दोघांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी शुभमवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.दरम्यान, अपघाताची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, बीड ग्रामीण ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ, महामार्गचे पोउपनि भास्कर नवले, भागवत शेलार, जयसिंग वाघ यांच्यासह कर्मचाºयांनी धाव घेतली. पंचनामा करून वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. तोपर्यंत बघ्यांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.बँडबाजा ऐवजी आक्रोश आणि हुंदकेतेजसचा भाऊ कुंभेश यांचे रविवारी कपिलधार येथे दुपारच्यावेळी लग्न होते. बँडबाजाच्या आवाजात सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने लग्नकार्यात गुंतले होते. त्याचवेळी अपघातात लग्नघरातील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी वार्ता आली आणि क्षणात सर्व परिसर आक्रोश आणि हुंदक्यांनी भरून गेला.त्यानंतर कुंभेश यांनी रुग्णालयात धाव घेतली असता भाऊ तेजस, मामेभाऊ अक्षय, मेहुणे सौरभ आणि मंगेश यांचे मृतदेह पाहून त्यांनाही भोवळ आली. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी लगोलग त्यांच्यावर उपचार केले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू