शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

रस्त्यावर पार्किंगने वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:20 IST

अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चार चाकी व दुचाकी वाहने पार्किंग होत असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे ...

अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चार चाकी व दुचाकी वाहने पार्किंग होत असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे होत आहेत. शहरातील बसस्थानक ते सायगाव नाका या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अस्ताव्यस्तपणे वाहने लावली जातात. परिणामी रस्त्यावरून चालतांना व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहनधारकांची वाहने या उभ्या वाहनांना धडकून अपघात होत आहेत. यामुळे वादाचे प्रसंगही यावेळी घडत आहेत. वाढत्या रहदारीमुळे अनेक वेळा रस्त्यातच रखडत उभी राहण्याची वेळ शहरवासियांवर येत आहे.

प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था

अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. यावर्षी झालेल्या वादळी पावसाने प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने, तर अनेक ठिकाणचे बसण्यासाठीचे ओटे फुटल्याने प्रवासी जनतेसाठी ते निकामी ठरले आहेत. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये छत गळू लागल्याने या निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. हे प्रवासी निवारे दुरुस्त करावेत अशी मागणी होत आहे.

बचावासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम

अंबाजोगाई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात व सर्वच ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या वाढत्या गर्दीमुळे संसर्गाचा धोका पुन्हा उद्भवू शकतो. संभाव्य कोरोनाची लाट ओळखून शहरवासीयांनी दक्षता बाळगावी व मास्क हेच कोरोनावरील प्रमुख औषध समजून प्राधान्याने मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जत आहे.

तलाठी नसल्याने कामे होईनात

माजलगाव : तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणच्या इमारती अनेक महिन्यांपासून धूळखात असून महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. सज्जावर तलाठ्यांना थांबणे बंधनकारक असताना शासन नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. परिणामी गरजू शेतकरी, ग्रामस्थांना तलाठ्याचा शोध घ्यावा लागत आहे. परंतु तलाठी सापडत नसल्याने काम रखडत आहेत.