शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

बीडच्या बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच, यांना कोण आवरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:47 IST

जिल्हा प्रशासनाच्या सावधानता अन् सुरक्षिततेच्या आवाहनाकडे हुल्लडबाजांचे साफ दुर्लक्ष

बीड : तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असून, अचानक पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे धरण परिसरात जाणे टाळावे, धरणाच्या काठावर उभे राहून फोटो किंवा सेल्फी घेणे अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने टाळावे तसेच पालकांनी मुलांना धरण परिसरात जाण्यापासून रोखावे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. मात्र याकडे पर्यटक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

यापूर्वी २ युवकांचा दुर्दैवी मृत्यू१९ ऑक्टोबर २०२१ रोजी बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात बुडून ओंकार लक्ष्मण काळे (वय १६) आणि शिव संतोष पिंगळे (वय १६) यांचा मृत्यू झाला होता. दररोजच्या पावसाने पाणी पातळीत वाढ होत असून, धोक्यात जीव घालून लोखंडी पुलावरून धरणाच्या भिंतीवर व पायथ्याशी पर्यटक सांडव्याच्या ठिकाणी जमा होत आहे. सांडव्याच्या भिंतीवर चढून फोटो काढतात. पाय घसरून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावीबिंदुसरा धरणाच्या सांडव्याशेजारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कडेला सावधान, प्रतिबंधक क्षेत्र असा फलक लावण्यात आला आहे. अपघात, दुर्घटना अथवा जिवितहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार नाही, कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून असा फलक लावण्यात आला आहे. या तलावाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संरक्षण व्यवस्था नसल्यामुळेच त्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारी झटकतात मात्र प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सुरक्षारक्षक नेमकं काय काम करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत. भविष्यात दुर्घटना घडल्यास संबधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

टॅग्स :DamधरणBeedबीडRainपाऊस