शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना किंचित दिलासा, माजलगावातील तिन्ही कारखाने पावसाळ्यापर्यंत उसाचे गाळप करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:11 IST

जूनपर्यंत कारखाने जरी चालू राहिले तरी आताच पाणी बंद केल्याने तसेच अनेकांचे बोअर व विहीर आटल्याने अनेकांच्या उसाचे सरपन झाल्याशिवाय राहणारच नाही

- पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील तीन कारखान्याच्या हद्दीत अद्याप सात लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असून, राहिलेल्या उसाचे गाळप पावसाळा सुरू होईपर्यंत करण्याचा शब्द अतिरिक्त ऊस गाळप नियोजन बैठकीत तिन्ही कारखान्यांनी दिला आहे. यातील निम्मा ऊस जयमहेश, तर निम्मा ऊस सोळंके व छत्रपती कारखाना गाळप करणार असल्याचा शब्द दिल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

सोमवारी समर्थ साखर कारखान्यावर औरंगाबाद व नांदेड विभागातील २०२१-२२ ऊस गाळप आढावा व अतिरिक्त ऊस गाळप नियोजन बैठक राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आमदार बाबाजानी दुर्रानी, साखर संचालक पांडुरंग शेळके, प्रादेशिक संचालक शरद जर, नांदेडचे एस. बी. रावळ यांच्या उपस्थितीत सर्व मराठवाड्यातील सर्व कारखान्यांची ही बैठक होती.

या बैठकीत माजलगाव तालुक्यात सात लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. हा सर्व ऊस जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप करणार असल्याचा शब्द माजलगावच्या तिन्ही कारखान्यांनी या बैठकीत दिला असल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी ३ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप एकटा जय महेश करणार असून, उर्वरित ३ लाख ५० हजार मेट्री टन उसाचे गाळप सुंदरराव सोळुंके व छत्रपती साखर कारखाना करणार असल्याचा शब्द देण्यात आला आहे.

जूनपर्यंत कारखाने जरी चालू राहिले तरी आताच पाणी बंद केल्याने तसेच अनेकांचे बोअर व विहीर आटल्याने अनेकांच्या उसाचे सरपन झाल्याशिवाय राहणारच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे जून पर्यंत कारखान्यांना कितपत चांगला ऊस मिळेल हे सांगणे आज तरी कठीण आहे.

जय महेश कारखान्याने आत्तापर्यंत नऊ लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त उसाचे गाळप केले असून उर्वरित उसापैकी निम्म्या उसाचे गाळप आम्ही करणार आहोत. यासाठी आम्हाला आणखी तीन महिने लागले तरी आम्ही पूर्ण ऊस घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. -गिरीश लोखंडे, उपाध्यक्ष, जयमहेश शुगर्स, पवारवाडी, माजलगाव

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबाद