शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शेतकऱ्यांना किंचित दिलासा, माजलगावातील तिन्ही कारखाने पावसाळ्यापर्यंत उसाचे गाळप करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:11 IST

जूनपर्यंत कारखाने जरी चालू राहिले तरी आताच पाणी बंद केल्याने तसेच अनेकांचे बोअर व विहीर आटल्याने अनेकांच्या उसाचे सरपन झाल्याशिवाय राहणारच नाही

- पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील तीन कारखान्याच्या हद्दीत अद्याप सात लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असून, राहिलेल्या उसाचे गाळप पावसाळा सुरू होईपर्यंत करण्याचा शब्द अतिरिक्त ऊस गाळप नियोजन बैठकीत तिन्ही कारखान्यांनी दिला आहे. यातील निम्मा ऊस जयमहेश, तर निम्मा ऊस सोळंके व छत्रपती कारखाना गाळप करणार असल्याचा शब्द दिल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

सोमवारी समर्थ साखर कारखान्यावर औरंगाबाद व नांदेड विभागातील २०२१-२२ ऊस गाळप आढावा व अतिरिक्त ऊस गाळप नियोजन बैठक राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आमदार बाबाजानी दुर्रानी, साखर संचालक पांडुरंग शेळके, प्रादेशिक संचालक शरद जर, नांदेडचे एस. बी. रावळ यांच्या उपस्थितीत सर्व मराठवाड्यातील सर्व कारखान्यांची ही बैठक होती.

या बैठकीत माजलगाव तालुक्यात सात लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. हा सर्व ऊस जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप करणार असल्याचा शब्द माजलगावच्या तिन्ही कारखान्यांनी या बैठकीत दिला असल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी ३ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप एकटा जय महेश करणार असून, उर्वरित ३ लाख ५० हजार मेट्री टन उसाचे गाळप सुंदरराव सोळुंके व छत्रपती साखर कारखाना करणार असल्याचा शब्द देण्यात आला आहे.

जूनपर्यंत कारखाने जरी चालू राहिले तरी आताच पाणी बंद केल्याने तसेच अनेकांचे बोअर व विहीर आटल्याने अनेकांच्या उसाचे सरपन झाल्याशिवाय राहणारच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे जून पर्यंत कारखान्यांना कितपत चांगला ऊस मिळेल हे सांगणे आज तरी कठीण आहे.

जय महेश कारखान्याने आत्तापर्यंत नऊ लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त उसाचे गाळप केले असून उर्वरित उसापैकी निम्म्या उसाचे गाळप आम्ही करणार आहोत. यासाठी आम्हाला आणखी तीन महिने लागले तरी आम्ही पूर्ण ऊस घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. -गिरीश लोखंडे, उपाध्यक्ष, जयमहेश शुगर्स, पवारवाडी, माजलगाव

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबाद