शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

"ही लढाई फक्त देशमुख कुटुंबीयांची नाही"; मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:41 IST

सद्भावना यात्रा समाजमन जोडण्याचे काम करणार आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका

मस्साजोग (बीड): सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येने महाराष्ट्र हादरला होता. आरोपींच्या क्रूरतेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली. दोन महिन्यांपासून देशमुख कुटुंब आणि त्यांच्या सोबतीला इतर समाज घटक न्यायासाठी लढा देत आहेत. या प्रकरणाच्या परिणामी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र लढा अद्याप संपलेला नाही. आता या प्रकरणी कॉंग्रेसने मस्साजोग ते बीड अशी ५१ किमीची सद्भावना यात्रा आज सकाळपासून सुरू केली आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही लढाई फक्त देशमुख कुटुंबाची नाही, सर्वांनी यात सामील व्हावे, असे आवाहन करत सद्भावना यात्रा समाजमन जोडण्याचे काम करणार आहे, अशी भूमिका मांडली.

आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग येथे दाखल झाले, जिथे त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांच्या न्यासाठीच्या लढ्याला पाठींबा जाहीर केला. त्यानंतर सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा सुरू झाली आहे. यात देशमुख कुटुंबीय देखील सामील झाले आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी समाजाला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे नेणारा आहे. मात्र, जर एका उमद्या तरुणाची अशी क्रूर हत्या होत असेल, तर संपूर्ण समाजाने यावर चिंतन करण्याची गरज आहे. संपूर्ण समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही." ते पुढे म्हणाले, "भय, द्वेष, मत्सर आणि पैशांची लालसा यामुळे ही हत्या झाली. आरोपींनी क्रूरतेने हसत हत्या केली, हे पाहून काळजाचा थरकाप उडतो. ही केवळ देशमुख कुटुंबियांची लढाई नाही, तर संपूर्ण समाजाने लढायची आहे."  

जातीयतेच्या राजकारणावर टीका  हर्षवर्धन सपकाळ यांनी देशमुख कुटुंबीयांच्या संयमाचे कौतुक केले आणि धार्मिक व जातीयतेच्या राजकारणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "देशमुख कुटुंबियांनी अत्यंत विवेकपूर्ण भूमिका घेतली. त्यांनी कोणत्याही जाती-धर्मावर दोष न ठेवता न्यायाची लढाई सुरू ठेवली आहे. मात्र, समाजाला फोडून राज्य करण्याच्या प्रवृत्ती सक्रिय झाल्या आहेत. जाती-धर्मांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे."

सद्भावना यात्रा केवळ लोकशाहीच्या रक्षणासाठीसपकाळ यांनी स्पष्ट केले की, सद्भावना यात्रा कोणत्याही निवडणुकीसाठी नाही, तर समाजात एकता टिकवण्यासाठी आहे. ते म्हणाले, "या क्रूर हत्येने माझे मन सुन्न झाले आहे. हा समाज असा कसा निर्माण झाला, असा प्रश्न मला पडतो. मात्र, देशमुख कुटुंबियांनी दाखवलेली सहनशीलता आणि सद्भावना लोकशाहीच्या रक्षणासाठी आवश्यक आहे." ही यात्रा समाजात सलोखा प्रस्थापित करण्यासाठी आणि हिंसाचाराला विरोध करण्यासाठी एक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेस