शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

‘शिवशाही’त ४० प्रवासी गुदमरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:43 AM

खाजगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसमधून प्रवासाचा वाईट अनुभव येत आहे.

ठळक मुद्देएसी पडला बंद । दीडपट भाडे मोजूनही प्रवाशांना मन:स्तापच

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खाजगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसमधून प्रवासाचा वाईट अनुभव येत आहे. शनिवारी औरंगाबाद ते अंबाजोगाई प्रवास करणाऱ्या शिवशाही बसमधील प्रवाशांना ‘नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा’ याप्रमाणे अनुभव आला. एसी बंद पडल्याने दोन तास प्रवाशांची घुसमट झाली. साध्या बसच्या तुलनेत दीडपट भाडे भरून बसमधील ४० प्रवाशांना गुदमरण्याची वेळी आली.दुपारी २ वाजता सिडको येथून औरंगाबाद- अंबाजोगाई शिवशाही बस निघाली. त्याचवेळी कमी गतीमध्ये एसी सुरु असूनही प्रवासी घामाघूम झाले. उन्हामुळे बस तापली आहे. काही वेळाने थंड वाटेल असे वाहकाने सांगितले. मात्र, पाचोडजवळ बस येताच एसी पूर्णत: बंद पडला. त्यामुळे सर्वच प्रवाशांना गुदमरल्यासारखे होऊ लागले. बसचे ‘रुफ विन्डो’ लॉक झाल्याने उघडता आली नाही. येथे काहीच करता येत नाही, म्हणत चालकाने वेळ मारुन नेली. घुसमटलेल्या काही प्रवाशांनी आॅनलाईन तक्रार केली. कसेबसे बीडला पोहोचल्यानंतर प्रवाशांची तक्रार ऐकून घ्यायला कोणी तयार नव्हते. अखेर नियंत्रण कक्षातील पुस्तिकेत दहा जणांनी तक्रार नोंदवली.२५५ रुपये भाडे घेणाºया शिवशाहीत साध्या बसइतकीही सुविधा मिळू न शकल्याने तिकिटाची रक्कम परत मिळावी, अशी मागणी मन:स्ताप झालेल्या प्रवाशांनी केली. बसमध्ये आजारी, दमा असणारा प्रवासी असता तर अघटित घडले असते, असे रामेश्वर क्षीरसागरसह इतर प्रवाशांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटीShivshahiशिवशाही