शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

हिवाळ्यातच वाढली तहान; फळबागा झाल्या बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:47 AM

निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी आष्टी तालुक्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नाही. अल्पशा पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी काहीच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी वाया गेली. ऊस, कापूस, ज्वारी या पिकांबरोबरच डाळिंब, लिंबाच्या बाग जळू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्दे२० टँकर सुरू : आष्टी पंचायत समितीत टँकरचे ७६ प्रस्ताव दाखल; पाणी व चारा टंचाईवर तातडीने उपायांची गरज

अविनाश कदम।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी आष्टी तालुक्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नाही. अल्पशा पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी काहीच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी वाया गेली. ऊस, कापूस, ज्वारी या पिकांबरोबरच डाळिंब, लिंबाच्या बाग जळू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील मेहेकरी व कढाणी धरणात अल्प प्रमाणात पाणीसाठा असून इतर छोटे मोठे धरण कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे आष्टी तालुक्यात पाणी टंचाईबरोबरच चारा टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने टँकरबरोबरच गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. आष्टी पंचायत समितीत ७६ टँकरचे प्रस्ताव दाखल आहेत. पुढील पाणी टंचाई कमी करण्यासाठी कुकडीचे पाणी मेहकरी धरणात सोडल्यास याचा तालुक्याला फायदा होईल व येथून टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे सोपे जाऊन शासनाचे लाखो रूपयांची बचत होऊ शकते.पंचायत समितीमध्ये ७६ टँकरचे प्रस्ताव दाखलसध्या आष्टी तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तालुक्यातून आजपर्यंत टँकर चालू करण्यासाठी एकूण ७६ प्रस्ताव दाखल आहेत. त्यापैकी २० टँकर मंजूर करण्यात आले आहे. हे पुढील प्रमाणे लोणी सय्यदमीर, पारगाव जोगेश्वरी, शेडाळा, चिंचोली, सांगवी (आ), काकडवाडी, अरणविहिरा, खरडगव्हाण, पांगरा, कोयाळ, चिखली, खडकत, टाकळसिंग, हिंगणी या गावांत टँकर सुरु झाले असून, उर्वरित ६२ प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविले आहेत.टँकरने पाणीपुरवठा करत असलेल्या गावात दरडोई २० लिटर पाणी देत असल्याची माहिती गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रwater shortageपाणीटंचाई