शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

'३५ वर्षांच्या अनुभवातून सांगतो, राज्यात राजकीय भूकंप होणारच'; राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 18:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केला अंदाज

- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड) : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असा अंदाज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगाव विधानसभेचे आ. प्रकाश सोळंके यांनी आज व्यक्त केला. ते येथील बाजार समिती निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेले आहे. माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि इतर काही आमदार भाजपसोबत जाण्याच्या विचारात आहेत, अशी चर्चा सुरु होती. मात्र, अजित पवार यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. दरम्यान, वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी तसेच काही राजकीय अभ्यासक राज्यात लवकरच राजकीय भूकंप होईल यावर मतांवर ठाम आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील राज्यात राजकीय भूकंप नक्कीच होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना आमदार सोळंके म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे भाजपाचे ध्येय आहे. त्यामुळे सध्याचे राजकारण पाहता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मी मागील पंधरा दिवसांपासून मुंबईला गेलेलो नाही. मुंबईत सध्या काय घडामोडी चालू आहे याबाबत मला कसली माहिती नाही. परंतु, माझा ३५ वर्षाचा राजकीय अनुभव पाहता मला असे वाटते की, लवकरच महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. या पत्रकार परिषदेला बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक हे देखील उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Solankeप्रकाश सोळंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाBeedबीड