शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

कोविड कालावधीत जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा व शासनात ताळमेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:35 IST

आष्टी येथील गणेश विद्यालयात उभारलेल्या श्रीदत्त आयसोलेशन कोविड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी दरेकर बोलत होते. यावेळी आ.सुरेश धस,तहसीलदार राजाभाऊ कदम,ना.तहसिलदार ...

आष्टी येथील गणेश विद्यालयात उभारलेल्या श्रीदत्त आयसोलेशन कोविड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी दरेकर बोलत होते. यावेळी आ.सुरेश धस,तहसीलदार राजाभाऊ कदम,ना.तहसिलदार प्रदिप पांडूळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के,जयदत्त धस,भाजपा ता.सरचिटणीस शंकर देशमुख,पं.स.सभापती बद्रीनाथ जगताप,अनिल ढोबळे,डाॕ.नितीन घोडके,सुनील रेडेकर,विनय पडधरीया आदी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, बीड जिल्हा प्रशासकीय यंत्रणा आणि शासन यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे अनेक कोविड सेंटरमधील रुग्ण तोंडाला मास्क न बांधता जनतेत मिसळतात. काही ठिकाणी कोविड सेंटरवर जेवण मिळत नसल्यामुळे रुग्ण पळून जात असल्याचेही दिसून आले तर अंबाजोगाई येथे ऑक्सिजन कमी पडल्यामुळे रुग्ण दगावण्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावरून प्रशासन ढिसाळ असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाचा टेस्टिंग कमी करण्याचा निर्णय हा केवळ रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी आहे, असे दिसून आले आहे.परंतु असे करणे म्हणजे भविष्यात फार मोठा धोका पत्करण्यासारखे असल्याचे दरेकर म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. दिपक भवर यांनी केले.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केलेलं ‘राज्यातील कोरानाची लाट कमी होण्यास सुरुवात झाली आहे’ हे वक्तव्य चुकीचे असल्याचे आ. सुरेश धस यावेळी म्हणाले. राज्यभरात बहुतांश ठिकाणी कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या किटची कमतरता असल्यामुळे मागील ८ दिवसांपासून चाचण्याच बंद आहेत.कोरोनाची दाहकता वाढत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं कमी कमी पडत आहेत, अशा गंभीर परिस्थितीत हे वक्तव्य चुकीचे असल्याचे मत आ. धस यांनी व्यक्त केले.

===Photopath===

050521\img-20210505-wa0534_14.jpg