शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

...तर वाल्मीक कराड ३०२ मध्ये येऊ शकतो; सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:34 IST

धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची केली मागणी...

 

मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडें यांना बिनखात्याचे मंत्री ठेवा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उचललेल्या पावलांमुळे शेवटी वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. त्याच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी सरकारने न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. करोडोंची मालमत्ता जप्त झाल्याशिवाय कराड गॅंगचे अन्य गुन्हे उघड होणार नाहीत, असे आ. धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. 

याप्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी असून त्याचा आणि प्रतीक घुले या दोघांचा जास्त सहभाग आहे. वाल्मीक कराड (आका) आता शरण आले आहेत हे शंभर टक्के १२० ब मध्ये आहेत; पण माझा अंदाज आहे जर त्यांनीही व्हिडीओ कॉल पाहिला असेल तर ते पण ३०२ मध्ये येऊ शकतात, असे धस म्हणाले.

वाल्मीक कराडला व्हीआयपी वागणूक नकोपुणे : वाल्मीक कराड आपणहून पोलिसांना शरण आला आहे. आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे. मात्र, कराड याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणेच वागणूक मिळावी. त्याला व्हीआयपी वागणूक दिली जाऊ नये, अशी मागणी मराठा सेवकांनी  (अखंड मराठा समाज - जरांगे पाटील)  केली आहे. 

कराड याने सीआयडी मुख्यालयात येऊन आत्मसमर्पण केल्यावर अखंड मराठा समाज जरांगे पाटील यांचे काही मराठा  सेवक सीआयडी कार्यालयाच्या परिसरात जमा झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना आत येण्यास मज्जाव केला. 

मराठा सेवक अर्चना शहा भिवरे पाटील म्हणाल्या, आम्ही जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पुण्यात मराठा सेवक म्हणून काम करीत आहोत. आज मराठा असलेले संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली, या हत्येचा निषेध म्हणून आम्ही मोर्चे काढत होतो, सभा घेत होतो. त्याला कुठे तरी यश मिळाले आणि कराड हा पोलिसांसमोर शरण आला. कुठल्याही  परिस्थितीत वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी.

आ. धस यांनी पुन्हा वाचला बीडचा पाढाऑक्टोबर २०२३ ला पाटोदा तालुक्यात अशीच घटना घडली होती. एका कंपनीच्या बंडगर नावाच्या  अधिकाऱ्यांना असेच उचलण्यात आले होते, तेव्हा मी सांगितले होते परळी पॅटर्न पाटोद्यात आणू नका. खालचा अधिकारी उचलायचा आणि खंडणी मागायची, असे प्रकार सुरू होते. असे प्रकार पचल्याने दोन कोटींची खंडणी मागायची यांची हिंमत झाली. पन्नास लाख घेतले. उरलेले दीड कोटी मागायला माणसे पाठविली होती. आकानेच ही माणसे पाठविली होती. याप्रकरणी मोक्का कायदा लावण्याची घोषणा आधीच मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असेही धस म्हणाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धसSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर