शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

...तर वाल्मीक कराड ३०२ मध्ये येऊ शकतो; सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:34 IST

धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची केली मागणी...

 

मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडें यांना बिनखात्याचे मंत्री ठेवा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उचललेल्या पावलांमुळे शेवटी वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. त्याच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी सरकारने न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. करोडोंची मालमत्ता जप्त झाल्याशिवाय कराड गॅंगचे अन्य गुन्हे उघड होणार नाहीत, असे आ. धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. 

याप्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी असून त्याचा आणि प्रतीक घुले या दोघांचा जास्त सहभाग आहे. वाल्मीक कराड (आका) आता शरण आले आहेत हे शंभर टक्के १२० ब मध्ये आहेत; पण माझा अंदाज आहे जर त्यांनीही व्हिडीओ कॉल पाहिला असेल तर ते पण ३०२ मध्ये येऊ शकतात, असे धस म्हणाले.

वाल्मीक कराडला व्हीआयपी वागणूक नकोपुणे : वाल्मीक कराड आपणहून पोलिसांना शरण आला आहे. आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे. मात्र, कराड याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणेच वागणूक मिळावी. त्याला व्हीआयपी वागणूक दिली जाऊ नये, अशी मागणी मराठा सेवकांनी  (अखंड मराठा समाज - जरांगे पाटील)  केली आहे. 

कराड याने सीआयडी मुख्यालयात येऊन आत्मसमर्पण केल्यावर अखंड मराठा समाज जरांगे पाटील यांचे काही मराठा  सेवक सीआयडी कार्यालयाच्या परिसरात जमा झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना आत येण्यास मज्जाव केला. 

मराठा सेवक अर्चना शहा भिवरे पाटील म्हणाल्या, आम्ही जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पुण्यात मराठा सेवक म्हणून काम करीत आहोत. आज मराठा असलेले संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली, या हत्येचा निषेध म्हणून आम्ही मोर्चे काढत होतो, सभा घेत होतो. त्याला कुठे तरी यश मिळाले आणि कराड हा पोलिसांसमोर शरण आला. कुठल्याही  परिस्थितीत वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी.

आ. धस यांनी पुन्हा वाचला बीडचा पाढाऑक्टोबर २०२३ ला पाटोदा तालुक्यात अशीच घटना घडली होती. एका कंपनीच्या बंडगर नावाच्या  अधिकाऱ्यांना असेच उचलण्यात आले होते, तेव्हा मी सांगितले होते परळी पॅटर्न पाटोद्यात आणू नका. खालचा अधिकारी उचलायचा आणि खंडणी मागायची, असे प्रकार सुरू होते. असे प्रकार पचल्याने दोन कोटींची खंडणी मागायची यांची हिंमत झाली. पन्नास लाख घेतले. उरलेले दीड कोटी मागायला माणसे पाठविली होती. आकानेच ही माणसे पाठविली होती. याप्रकरणी मोक्का कायदा लावण्याची घोषणा आधीच मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असेही धस म्हणाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धसSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर