शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

तीन पिढ्यांचे समर्पण, तापलेल्या भट्टीजवळ १२ ते १५ तास श्रमातून साकारतो साखरगाठींचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 19:13 IST

होळी आणि गुढीपाडव्याचे वेध लागताच महाशिवरात्रीपासून साखरगाठींच्या कारखान्यांची भट्टी पेटते.

- अनिल भंडारीबीड : होळी आणि विशेषत: गुढीपाडव्याला महत्व असलेल्या साखरगाठी बनविण्याचे काम येथील कारखान्यांमध्ये सुरू आहे. तापलेल्या भट्टीजवळ बारा ते पंधरा तास कामगारांच्या श्रमातून साखरगाठींचा गोडवा शहरातील १५ प्रमुख कुटुंबांसह दीडशेपेक्षा जास्त कामगारांचे कुटुंब चाखत आहेत.

होळी आणि गुढीपाडव्याचे वेध लागताच महाशिवरात्रीपासून साखरगाठींच्या कारखान्यांची भट्टी पेटते. ऐनवेळी कोरोना लॉकडाऊनमुळे २०२०मध्ये साखरगाठी करणाऱ्यांना आर्थिक फटका बसला. २०२१मध्ये दिलासा मिळाला. परंतु विक्री घटली. यंदा तशी परिस्थिती नसल्याने साखरगाठी बनविणाऱ्यांचे धाडस वाढले आहे. बीड शहरात जवळपास १५ कुटुंब साखरगाठीच्या व्यवसायात अनेक वर्षांपासून रमलेली आहेत. एक- दोन कुटुंब तर तीन पिढ्यांपासून कारखाना चालवतात. मजुरांची उपलब्धता, साखर व इंधनाची तजवीज करून कामाला सुरूवात करतात. यामुळे शेकडो लोकांना राेजगाराची सोय झाली आहे.

...तर घामाघूम व्हालकारखान्यात क्षणात घामाघूम होईल, अशी उष्णता पेटलेल्या भट्ट्यांमुळे असते. तापलेल्या भट्टीवर साखरेच्या द्रावणात दूध व लिंबाचा वापर करून पांढराशुभ्र पाक ठराविक तापमानात दोघेे तयार करतात. नंतर इतर कामगार तयार पाक दोऱ्यासह लाकडी साच्यांमध्ये भरतात. काही वेळेत आकाराप्रमाणे साखरगाठी तयार होतात.

१२ तास भट्टीजवळमुख्य कारागिरासह मजूर तापलेल्या भट्टीजवळच १२ ते १५ तास साखरगाठी बनविण्यात व्यस्त असतात. उपलब्ध क्षमतेनुसार साखरगाठींचे दररोज उत्पादन केले जाते. गत काही महिन्यांपासून महागाईचा अंदाज घेत साखरेच्या खरेदीमुळे भाववाढीचा फारसा फरक पडत नसल्याचे संतोष काजळे यांनी सांगितले.

बीडची साखरगाठी परजिल्ह्यातहीबीडमधील उत्पादकांची साखरगाठी शुभ्रतेच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे बीड जिल्हा तसेच औरंगाबाद, जालना, नगर, पुणे बारामती, कुंथलगिरीसह इतरत्र विकली जाते. गतवर्षी बाजाराचा अंदाज घेऊनच गाठीचे उत्पादन केल्याचे रमेश कांबळे यांनी सांगितले.

साखरगाठीची तिसरी पिढीनिजामकाळातील चौथी पास असलेले पेठ बीड भागातील १०५ वर्षांचे सटवाजी यमनाजी कांबळे १५ वर्षांपासून लोकमत वाचतात. ते म्हणाले, आई - वडील साखरगाठी बनवायचे, त्यांच्या हाताखाली काम करायचो. नंतर जबाबदारी आली आणि ती पेलली. आता मुले, नातवंडे कारखाना चालवतात. साखरगाठीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. मजुरांची काळजी घ्यावी लागते. कोणताही अपघात होऊ नये म्हणून सावध राहावे लागते. अलिकडच्या काही वर्षात मजूर कमी झालेत. जे मिळतात, ते रोजंदारीऐवजी उत्पादनावर मजुरी ठरवतात.

टॅग्स :BeedबीडHoliहोळी 2022