शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

तीन पिढ्यांचे समर्पण, तापलेल्या भट्टीजवळ १२ ते १५ तास श्रमातून साकारतो साखरगाठींचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 19:13 IST

होळी आणि गुढीपाडव्याचे वेध लागताच महाशिवरात्रीपासून साखरगाठींच्या कारखान्यांची भट्टी पेटते.

- अनिल भंडारीबीड : होळी आणि विशेषत: गुढीपाडव्याला महत्व असलेल्या साखरगाठी बनविण्याचे काम येथील कारखान्यांमध्ये सुरू आहे. तापलेल्या भट्टीजवळ बारा ते पंधरा तास कामगारांच्या श्रमातून साखरगाठींचा गोडवा शहरातील १५ प्रमुख कुटुंबांसह दीडशेपेक्षा जास्त कामगारांचे कुटुंब चाखत आहेत.

होळी आणि गुढीपाडव्याचे वेध लागताच महाशिवरात्रीपासून साखरगाठींच्या कारखान्यांची भट्टी पेटते. ऐनवेळी कोरोना लॉकडाऊनमुळे २०२०मध्ये साखरगाठी करणाऱ्यांना आर्थिक फटका बसला. २०२१मध्ये दिलासा मिळाला. परंतु विक्री घटली. यंदा तशी परिस्थिती नसल्याने साखरगाठी बनविणाऱ्यांचे धाडस वाढले आहे. बीड शहरात जवळपास १५ कुटुंब साखरगाठीच्या व्यवसायात अनेक वर्षांपासून रमलेली आहेत. एक- दोन कुटुंब तर तीन पिढ्यांपासून कारखाना चालवतात. मजुरांची उपलब्धता, साखर व इंधनाची तजवीज करून कामाला सुरूवात करतात. यामुळे शेकडो लोकांना राेजगाराची सोय झाली आहे.

...तर घामाघूम व्हालकारखान्यात क्षणात घामाघूम होईल, अशी उष्णता पेटलेल्या भट्ट्यांमुळे असते. तापलेल्या भट्टीवर साखरेच्या द्रावणात दूध व लिंबाचा वापर करून पांढराशुभ्र पाक ठराविक तापमानात दोघेे तयार करतात. नंतर इतर कामगार तयार पाक दोऱ्यासह लाकडी साच्यांमध्ये भरतात. काही वेळेत आकाराप्रमाणे साखरगाठी तयार होतात.

१२ तास भट्टीजवळमुख्य कारागिरासह मजूर तापलेल्या भट्टीजवळच १२ ते १५ तास साखरगाठी बनविण्यात व्यस्त असतात. उपलब्ध क्षमतेनुसार साखरगाठींचे दररोज उत्पादन केले जाते. गत काही महिन्यांपासून महागाईचा अंदाज घेत साखरेच्या खरेदीमुळे भाववाढीचा फारसा फरक पडत नसल्याचे संतोष काजळे यांनी सांगितले.

बीडची साखरगाठी परजिल्ह्यातहीबीडमधील उत्पादकांची साखरगाठी शुभ्रतेच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे बीड जिल्हा तसेच औरंगाबाद, जालना, नगर, पुणे बारामती, कुंथलगिरीसह इतरत्र विकली जाते. गतवर्षी बाजाराचा अंदाज घेऊनच गाठीचे उत्पादन केल्याचे रमेश कांबळे यांनी सांगितले.

साखरगाठीची तिसरी पिढीनिजामकाळातील चौथी पास असलेले पेठ बीड भागातील १०५ वर्षांचे सटवाजी यमनाजी कांबळे १५ वर्षांपासून लोकमत वाचतात. ते म्हणाले, आई - वडील साखरगाठी बनवायचे, त्यांच्या हाताखाली काम करायचो. नंतर जबाबदारी आली आणि ती पेलली. आता मुले, नातवंडे कारखाना चालवतात. साखरगाठीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. मजुरांची काळजी घ्यावी लागते. कोणताही अपघात होऊ नये म्हणून सावध राहावे लागते. अलिकडच्या काही वर्षात मजूर कमी झालेत. जे मिळतात, ते रोजंदारीऐवजी उत्पादनावर मजुरी ठरवतात.

टॅग्स :BeedबीडHoliहोळी 2022