शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
3
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
4
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
5
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
6
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
7
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
8
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
9
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
10
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
11
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
12
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
13
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
14
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
15
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
16
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
17
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
18
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
19
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
20
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
Daily Top 2Weekly Top 5

मोहखेडमध्ये आगीत दहा एकर जंगलक्षेत्राची राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:39 IST

संतोष स्वामी दिंद्रुड : धारुर तालुक्यातील मोहखेड येथील वनविभागाच्या जंगलास रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग ...

संतोष स्वामी

दिंद्रुड : धारुर तालुक्यातील मोहखेड येथील वनविभागाच्या जंगलास रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून जवळपास दहा एकर वनजमीन जळून खाक झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली. ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. आगीच्या घटनेनंतर याकडे एकही वन अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत फिरकला नव्हता.

रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गावाच्या दक्षिण बाजूला जंगलाच्या मध्यभागी आग लागण्याची घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. लागलेली आग दिसताच व्हरकटवाडी व मोहखेड येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन झाडाच्या फांद्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात आग विझविणाऱ्या काहींचे कपडे पेटले. दीड तासानंतर आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनमजूर धनंजय सोळंके, मुरलीधर व्हरकटे, अंगद वाले उपस्थित झाले. वनरक्षकाने सायंकाळी उशिरा मोहखेडच्या डोंगरावर भेट देत पंचनामा केला. मात्र, वनअधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळाकडे फिरकले नाहीत.

वनसंपदेला क्षती

मोहखेड शिवारात मोठ्या प्रमाणात वनविभागाचे जंगल आहे. मागील तीन वर्षांपासून वनविभागाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून कडूनिंब, आवळा ,सिसू, खैर ,करंज, सीताफळ, साग, शिवन यासह अन्य झाडांची लागवड केली होती. सध्या ही झाडे पाच ते आठ फुटांपर्यंत वाढली होती. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गवतही होते. तसेच रानससे, हरिण, खोकड या प्राण्यांसह लांडोर, मोर, होला यासह अन्य पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात किलबिलाट वाढला आहे. या आगीमध्ये वन्यप्राणी मृत्युमुखी पडले का, याची माहिती मिळू शकली नाही.

जागृत ग्रामस्थांमुळे आग आटोक्यात

या आगीमध्ये जवळपास दहा एकरपेक्षा अधिक व जमीन जळून खाक झाली असल्याची स्थानिकांनी माहिती दिली. याठिकाणी जाळ पट्टी न काढल्यामुळे जमिनीचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी या ठिकाणी धावपळ करून आग विझवली नसती तर या परिसरातील मोठी वनसंपदा जळून खाक झाल्याची घटना घडली असती.

===Photopath===

280221\282_bed_30_28022021_14.jpg~280221\sanotsh swami_img-20210228-wa0051_14.jpg

===Caption===

मोहखेडच्या जंगलात आग लागून दहा एकरातील वनसंपदा खाक जाली. आग विझविण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी शर्थीचे  प्रयत्न केले. ~