शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

मोहखेडमध्ये आगीत दहा एकर जंगलक्षेत्राची राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:39 IST

संतोष स्वामी दिंद्रुड : धारुर तालुक्यातील मोहखेड येथील वनविभागाच्या जंगलास रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग ...

संतोष स्वामी

दिंद्रुड : धारुर तालुक्यातील मोहखेड येथील वनविभागाच्या जंगलास रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून जवळपास दहा एकर वनजमीन जळून खाक झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली. ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. आगीच्या घटनेनंतर याकडे एकही वन अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत फिरकला नव्हता.

रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गावाच्या दक्षिण बाजूला जंगलाच्या मध्यभागी आग लागण्याची घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. लागलेली आग दिसताच व्हरकटवाडी व मोहखेड येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन झाडाच्या फांद्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात आग विझविणाऱ्या काहींचे कपडे पेटले. दीड तासानंतर आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनमजूर धनंजय सोळंके, मुरलीधर व्हरकटे, अंगद वाले उपस्थित झाले. वनरक्षकाने सायंकाळी उशिरा मोहखेडच्या डोंगरावर भेट देत पंचनामा केला. मात्र, वनअधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळाकडे फिरकले नाहीत.

वनसंपदेला क्षती

मोहखेड शिवारात मोठ्या प्रमाणात वनविभागाचे जंगल आहे. मागील तीन वर्षांपासून वनविभागाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून कडूनिंब, आवळा ,सिसू, खैर ,करंज, सीताफळ, साग, शिवन यासह अन्य झाडांची लागवड केली होती. सध्या ही झाडे पाच ते आठ फुटांपर्यंत वाढली होती. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गवतही होते. तसेच रानससे, हरिण, खोकड या प्राण्यांसह लांडोर, मोर, होला यासह अन्य पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात किलबिलाट वाढला आहे. या आगीमध्ये वन्यप्राणी मृत्युमुखी पडले का, याची माहिती मिळू शकली नाही.

जागृत ग्रामस्थांमुळे आग आटोक्यात

या आगीमध्ये जवळपास दहा एकरपेक्षा अधिक व जमीन जळून खाक झाली असल्याची स्थानिकांनी माहिती दिली. याठिकाणी जाळ पट्टी न काढल्यामुळे जमिनीचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी या ठिकाणी धावपळ करून आग विझवली नसती तर या परिसरातील मोठी वनसंपदा जळून खाक झाल्याची घटना घडली असती.

===Photopath===

280221\282_bed_30_28022021_14.jpg~280221\sanotsh swami_img-20210228-wa0051_14.jpg

===Caption===

मोहखेडच्या जंगलात आग लागून दहा एकरातील वनसंपदा खाक जाली. आग विझविण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी शर्थीचे  प्रयत्न केले. ~