शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शेतकऱ्यांना बँकांवर गुन्हे दाखल करायला सांगेन - दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:04 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतक-यांची कर्जमाफी करावी. तसेच शेतक-यांची अडवणूक न करता खरीप पेरणीसाठी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. हलगर्जीपणा केल्यास शेतक-यांना बँकावर गुन्हे दाखल करायला सांगेन, मग नंतर न्यायालयात काय उत्तरे द्यायची ते द्या, जेलमध्ये जा अशी तंबी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बीड येथे गुरुवारी आढावा बैठकीत बॅँक अधिका-यांना दिली.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी व खरीप कर्जासंदर्भात आढावा

बीड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतक-यांची कर्जमाफी करावी. तसेच शेतक-यांची अडवणूक न करता खरीप पेरणीसाठी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. हलगर्जीपणा केल्यास शेतक-यांना बँकावर गुन्हे दाखल करायला सांगेन, मग नंतर न्यायालयात काय उत्तरे द्यायची ते द्या, जेलमध्ये जा अशी तंबी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बीड येथे गुरुवारी आढावा बैठकीत बॅँक अधिका-यांना दिली.

महाराष्ट्र शासनाने छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी याजनेचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज बीड जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी कर्जमाफी तसेच खरीप कर्ज देण्यासंदर्भात आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे, प्रमुख अधिकारी व जिल्ह्यातील सर्व बँकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत कोणत्या बँकेने किती शेतक-यांची कर्जमाफी केली, पीककर्ज नवीन किती शेतकºयांना वाटप केले. याविषयी प्रत्येक बँकेच्या अधिका-यांशी रावते यांनी चर्चा केली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील २ लाख ७५ हजार ३५२ शेतकरी पात्र असताना १ लाख ५४ हजार शेतक-यांनाच कर्जमाफी देण्यात आली आहे. ही तफावत का? असा सवाल रावते यांनी केला. याविषयी काय समस्या आहेत काय? याची विचारणा केली. नवीन नियमानुसार शेतक-यांनी कर्जमाफीच्या संदर्भात केलेले अर्ज आॅनलाईन करण्यासाठी वेळ लागत असल्याचे बँकेच्या अधिकाºयांनी सांगितले.पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावेसंपूर्ण जिल्ह्यामध्ये साडेसहा लाख शेतकरी आहेत. यामधील सर्व पात्र शेतक-यांना खरीपासाठी कर्ज द्यावे तसेच शेतक-यांची अडवणूक करू नये. व शासनाने दिलेले कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश रावते यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील कर्जमाफी व पीक कर्ज वाटपाचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द करणार असल्याचे रावते म्हणाले.

कर्जमाफीची रक्कम ठेवीदारांनाबीड जिल्हा बँकेकडे शेतकरी कर्जमाफीसाठी आलेले १६० कोटी रूपये ठेवीदारांच्या खात्यावर वळवले आहे. हे ठेवीदार नेमके कोण आहेत याची माहिती माहितीच्या अधिकारात घेण्याचे आदेश शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना दिले. तसेच या संदर्भात बँकेच्या प्रशासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे रावते म्हणाले.

व्याजाचा भार बँकांनी उचलावापत्रकारांशी बोलताना रावते म्हणाले, नवरा-बायको यांच्या नावे असलेले कर्ज वेगळे-वेगळे धरले जावे व दोघांना या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा. तसेच ज्या शेतकºयांकडे १.५० लाख कर्ज होते त्याचे व्याज वाढून १ लाख ७० हजार किंवा २ लाख झाले आहे. हा भार बँकांनी उचलावा व शेतकºयांना कर्जमाफी द्यावी. जेणेकरून बँकाकडे अधिक पैसे येतील त्यांची देखील आर्थिक परिस्थिती सुधारेल व जास्तीत-जास्त शेतकºयांना कर्जमाफी मिळेल. अशी नस्ती सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविली आहे. हा निर्णय देखील लवकरच होईल असे ते म्हणाले.

महत्वाकांक्षी योजनेला बदनाम करु नकारावते म्हणाले, २००१ ते २००९ या कालावधीत झालेल्या कर्जमाफीचा योग्य लाभ मराठवाडा व विदर्भातील शेतकºयांना झाला नव्हता. त्यांच्यावर अन्याय झाला होता. तसेच शेतकºयांवर ओढावलेली दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गंत झालेल्या कर्जमाफीचा अधिक लाभ मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना मिळावा ही शासनाची भावना आहे. बँकेच्या गलथान कारभारामुळे महत्वाकांक्षी योजनेला बदनाम करण्याचे काम करू नये, असे त्यांनी बजावले.

टॅग्स :BeedबीडCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा