बोअरला पाणी वाढल्याने नळाचे पाणी रस्त्यावर - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:17+5:302021-07-07T04:41:17+5:30
आष्टी : शहरातील उपनगर म्हणून ओळख असलेल्या मुर्शदपूर ग्रामपंचायतमधील अनिल भय्यानगरमध्ये पाणीपुरवठा केलेल्या नळाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात ...

बोअरला पाणी वाढल्याने नळाचे पाणी रस्त्यावर - A
आष्टी : शहरातील उपनगर म्हणून ओळख असलेल्या मुर्शदपूर ग्रामपंचायतमधील अनिल भय्यानगरमध्ये पाणीपुरवठा केलेल्या नळाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे पाहायला मिळाले.
रविवारी सायंकाळी ग्रामपंचायतने पाणीपुरवठा केला होता. मात्र या भागातील बऱ्याच रहिवाशांच्या बोअरला चांगले पाणी असल्याने नळाद्वारे आलेले पाणी अनेकांनी भरले नाही. परिणामी ते पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. नळांना तोट्या नसल्याने हे पाणी वाया जात आहे. याकडे मुर्शदपूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
कासारी मुर्शदपूर शिदेवाडी ग्रुप ग्रामपंचायत असून या भागात तालुक्यातील अनेक गावचे नागरिक व नोकरदार अनेक वर्षांपासून रहिवासी झालेले आहेत. ते स्थायिक झाल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने नागरिकांना पाणी टंचाई जाणवली नाही. जूनमध्ये पावसाने हजेरी लावली. काही गावांत बऱ्यापैकी पाऊस झाला. मुर्शदपूरमधील अनिल भय्यानगरमध्ये बहुतांश रहिवाशांच्या बोअरला पाणी आहे. त्यामुळे नळाद्वारे सोडण्यात आलेल पाणी त्यांनी भरले नाही. रस्त्यावर नळ घेतल्याने नळाला आलेले पाणी न भरल्याने तसेच तोटी नसल्याने पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात तळे साचले होते. ज्या नागरिकांनी नळ रस्त्यावर घेतलेले आहेत त्या नागरिकांना ग्रामपंचायतीने समज देऊन पाण्याची होणारी नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी अनिल भय्यानगरमधील रहिवाशांनी केली आहे.
040721\5226img-20210704-wa0440_14.jpg