शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

तिखट मिरचीने निर्माण केला गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST

धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी तिखट मिरचीचे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन ...

धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी तिखट मिरचीचे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन आपल्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे.

एकेकाळी डोंगराळ, दुष्काळी व ऊस तोडणी कामगारांचे गाव अशी ओळख असणारी जायभायवाडी आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहे. या गावातील तरुण शेतकरी पाणी फाउंडेशनच्या वाॕटर कप स्पर्धेतून झालेल्या कामाचा व परिर्तनाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. मेहनत घेऊन नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नवीन पिके घेत कमी क्षेत्रात चांगले उत्पादन घेऊन आर्थिक बाजू मजबूत करत आहेत. जायभायवाडी येथील तरुण शेतकरी अशोक जायभाये यांची डोंगरात शेती असूनही ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. गतवर्षी शेवग्याचे उत्पादन घेतले. यातून चांगला लाभ झाला, तर या वर्षी त्यांनी आपल्या डोंगराळ जमिनीवर फक्त २५ गुंठ्यांत मिरचीची चार हजार झाडे लावली. अडीच महिने जोपासना केली. पहिल्या तोडीला १६ क्विंटल मिरचीचे उत्पादन झाले. यातून ५० ते ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यापुढेही मिरचीचे दोन ते तीन तोडे होऊन पंचमीपर्यंत या मिरचीचे उत्पादन होईल, अशी आशा त्यांना आहे. कमी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानामुळे तिखट मिरची चांगला गोडवा निर्माण होत असून, इतर शेतकऱ्यांसाठी अशोक जायभाये यांची शेती मार्गदर्शक ठरत आहे.

===Photopath===

130321\anil mhajan_img-20210313-wa0028_14.jpg~130321\anil mhajan_img-20210312-wa0018_14.jpg

===Caption===

धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील अशोक जायभाये यांनी डोंगरात मिरचीची शेती जोपासली. बाजारात चांगला भाव  मिळत आहे.