शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

तिखट मिरचीने निर्माण केला गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST

धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी तिखट मिरचीचे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन ...

धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी तिखट मिरचीचे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन आपल्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे.

एकेकाळी डोंगराळ, दुष्काळी व ऊस तोडणी कामगारांचे गाव अशी ओळख असणारी जायभायवाडी आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहे. या गावातील तरुण शेतकरी पाणी फाउंडेशनच्या वाॕटर कप स्पर्धेतून झालेल्या कामाचा व परिर्तनाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. मेहनत घेऊन नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नवीन पिके घेत कमी क्षेत्रात चांगले उत्पादन घेऊन आर्थिक बाजू मजबूत करत आहेत. जायभायवाडी येथील तरुण शेतकरी अशोक जायभाये यांची डोंगरात शेती असूनही ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. गतवर्षी शेवग्याचे उत्पादन घेतले. यातून चांगला लाभ झाला, तर या वर्षी त्यांनी आपल्या डोंगराळ जमिनीवर फक्त २५ गुंठ्यांत मिरचीची चार हजार झाडे लावली. अडीच महिने जोपासना केली. पहिल्या तोडीला १६ क्विंटल मिरचीचे उत्पादन झाले. यातून ५० ते ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यापुढेही मिरचीचे दोन ते तीन तोडे होऊन पंचमीपर्यंत या मिरचीचे उत्पादन होईल, अशी आशा त्यांना आहे. कमी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानामुळे तिखट मिरची चांगला गोडवा निर्माण होत असून, इतर शेतकऱ्यांसाठी अशोक जायभाये यांची शेती मार्गदर्शक ठरत आहे.

===Photopath===

130321\anil mhajan_img-20210313-wa0028_14.jpg~130321\anil mhajan_img-20210312-wa0018_14.jpg

===Caption===

धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील अशोक जायभाये यांनी डोंगरात मिरचीची शेती जोपासली. बाजारात चांगला भाव  मिळत आहे.