शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तिखट मिरचीने निर्माण केला गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST

धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी तिखट मिरचीचे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन ...

धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी तिखट मिरचीचे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन आपल्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे.

एकेकाळी डोंगराळ, दुष्काळी व ऊस तोडणी कामगारांचे गाव अशी ओळख असणारी जायभायवाडी आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहे. या गावातील तरुण शेतकरी पाणी फाउंडेशनच्या वाॕटर कप स्पर्धेतून झालेल्या कामाचा व परिर्तनाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. मेहनत घेऊन नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नवीन पिके घेत कमी क्षेत्रात चांगले उत्पादन घेऊन आर्थिक बाजू मजबूत करत आहेत. जायभायवाडी येथील तरुण शेतकरी अशोक जायभाये यांची डोंगरात शेती असूनही ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. गतवर्षी शेवग्याचे उत्पादन घेतले. यातून चांगला लाभ झाला, तर या वर्षी त्यांनी आपल्या डोंगराळ जमिनीवर फक्त २५ गुंठ्यांत मिरचीची चार हजार झाडे लावली. अडीच महिने जोपासना केली. पहिल्या तोडीला १६ क्विंटल मिरचीचे उत्पादन झाले. यातून ५० ते ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यापुढेही मिरचीचे दोन ते तीन तोडे होऊन पंचमीपर्यंत या मिरचीचे उत्पादन होईल, अशी आशा त्यांना आहे. कमी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानामुळे तिखट मिरची चांगला गोडवा निर्माण होत असून, इतर शेतकऱ्यांसाठी अशोक जायभाये यांची शेती मार्गदर्शक ठरत आहे.

===Photopath===

130321\anil mhajan_img-20210313-wa0028_14.jpg~130321\anil mhajan_img-20210312-wa0018_14.jpg

===Caption===

धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील अशोक जायभाये यांनी डोंगरात मिरचीची शेती जोपासली. बाजारात चांगला भाव  मिळत आहे.