शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

रागातून आत्महत्येची ‘पोस्ट’; शोधासाठी प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:20 AM

घरगुती वाद, ताणतणाव, पैसा आदी कारणांमुळे तरूण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी सोशल मिडीयावर आत्महत्येची पोस्ट केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : घरगुती वाद, ताणतणाव, पैसा आदी कारणांमुळे तरूण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी सोशल मिडीयावर आत्महत्येची पोस्ट केली जात आहे. त्यानंतर त्याचा शोध घेताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ होते. रविवारीही असाच प्रकार घडला. माजी सरपंचाच्या मुलाने आत्महत्येची पोस्ट टाकली. त्याला वाचविण्यासाठी प्रशासनासह नातेवाईकांचे हाल झाले. त्याचे मनपरिवर्तन करून त्याला त्यापासून परावृत्त केले. मात्र मागील काही महिन्यांपासून आत्महत्येचे पोस्ट टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलणे गरजेचे आहे.दुपारी ४ वाजता माफीची पोस्टसकाळी आत्महत्येची पोस्ट केलेल्या तरूणानेच दुपारी ४ वाजता माफीची पोस्ट टाकली. मित्र व नातेवाईकांनी आपले मनपरिवर्तन केल्याचे त्याने कबुल केले. त्यानंतर जुनी पोस्ट काढून टाकली.सोशल मिडीयावर आत्महत्या करीत असल्याच्या पोस्टलाही अनेकांनी लाईक केले. कोणत्या पोस्टला काय करावे आणि काय नाही, याबाबतही नागरिक अनभिज्ञ असल्याचे यावरून दिसते. तर काहींनी कॉमेंट्स करून आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसल्याचे सुचविले. काहींनी अडचण असल्यास स्वत:चा मोबाईल क्रमांक देऊन अशा प्रकारापासून परावृत्त होण्यासाठी विनंती केली.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSuicideआत्महत्या