शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

राष्ट्रवादीच्या ७ तासांच्या ठिय्या आंदोलनास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:50 IST

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी काढलेल्या धडक मोर्चा आणि ७ तासांच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांत सोयाबीन पीकविम्याचे पैसे मिळणार : २५ आॅगस्टपर्यंत वैद्यनाथ कारखान्याची ऊस बिले मिळणार

परळी : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी काढलेल्या धडक मोर्चा आणि ७ तासांच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनच्या पीक विम्याचे पैसे ३ दिवसात देण्याचे तसेच वैद्यनाथ कारखान्याकडील ऊस गाळपाची बिले २५ आॅगस्टपर्यंत देण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने मोर्चा व आंदोलनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ७ तासांचे भर पावसातील हे आंदोलन मागे घेण्यात आले.सोयाबीनचा पीक विमा, वैद्यनाथ कारखान्याकडील बिले यासह १४ मागण्यांच्या संदर्भात धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देत धनंजय मुंडेंसह हजारो शेतकरी भर पावसात ७ तास बसून राहिले. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने तातडीने पावले उचलीत सर्व संबंधित विभागांकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मागवला. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार पाटील, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी तपकिरे, कृषी विभागाचे अधिकारी यांनी सर्व मागण्या मान्य करीत असल्याबाबत लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.लेखी दिलेल्या पत्रामध्ये सोयाबीन पीक विम्याबाबत प्रत्येक अर्जाची छाननी करुन सदर पीक विम्याचे वाटप येत्या ३ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. वैद्यनाथ कारखान्याकडील ऊस गाळपाची बिले २५ आॅगस्टपर्यंत अदा करण्याचे कारखान्याने कळविले आहे. दुबार पेरणीबाबत तलाठी व कृषी सहाय्यक यांना संयुक्तपणे स्थळ पाहणी करुन १० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. जिरायत व फळबाग अनुदान रक्कम शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात येईल, परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम ३ महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील, परळी बायपास रस्त्याचे काम वार्षिक आराखडा २०१९ मध्ये समावेश करून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पूर्ण केले जाईल. पाणी उपलब्ध होताच परळी औष्णिक विद्युत केंद्र सुरू केले जाईल. विद्युत मंडळाने दिलेल्या चुकीच्या बिलांची दुरुस्ती करून दिली जाईल. वीजेच्या तक्रारी दूर करीत चांदापूर प्रकल्पावरून परळीस पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. सरसकट कर्जमाफी, कृत्रिम पाऊस, वॉटरग्रीड योजनेत परळी तालुक्यातील प्रकल्पांचा समावेश, खडका धरणातून परळी शहरास पाणीपुरवठा याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने १६ आॅगस्ट रोजी बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले आहेत.मागण्यांना प्रतिसाद दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी प्रशासनाचे आभार मानले. मात्र, लेखी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाagitationआंदोलन