शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

सीना, मेहकरी तलावात १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:26 AM

आष्टी तालुक्यात शासकीय टँकरच्या माध्यमातून १७७ गावांसह अडीचशे वाडया-वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या सीना आणि मेहकरी धरणात आता १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात २ लाख ३५ हजार नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देअडीच लाख जनतेसमोर पाणीटंचाईचे भीषण संकट : १७७ गावांसह अडीचशे वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा

नितीन कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककडा : आष्टी तालुक्यात शासकीय टँकरच्या माध्यमातून १७७ गावांसह अडीचशे वाडया-वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या सीना आणि मेहकरी धरणात आता १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात २ लाख ३५ हजार नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.आष्टी तालुक्यात मागील तीन-चार वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती उदभवत आहे. यावर्षी गावागावात चारा-पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. डिसेंबरपूर्वीच लहान-मोठ्या प्रकल्पांसह विहीरी, हातपंपांनी तळ गाठला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. सध्या १७७ गावासह वाडी-वस्त्यांना जेमतेम पाणीसाठा शिल्लक असलेल्या सीना, मेहकरी धरणातून दिवसाला १७५ शासकीय टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.सीना - मेहकरी धरणातून दररोज टँकर भरण्यात येत असल्यामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी घटत चालली आहे. १५ दिवस पुरेल एवढाच मृतसाठा शिल्लक असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे धरणात पाणीच उपलब्ध नसेल तर टँकरमध्ये कुठून येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणात जो काही मृतसाठा शिल्लक आहे तो अशुध्द, गढूळ असल्याने पिण्यास योग्य नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण करू नये, म्हणून आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.अन्यथा पाणीटंचाईचं विदारक चित्र तालुका वासियांच्या वाट्याला येणार यात तिळमात्र शंका नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई