शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

शॉक ! ६० लाख रुपये खर्चूनही जीव धोक्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:58 IST

वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे. त्यामुळे महावितरणनकडून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम केले जात असल्याचे समोर येत आहे. पाच तालुक्यांतील खर्चाचा आकडा ऐकून आणि सुविधांचा अभाव पाहता सर्वसामान्यांनाही ‘शॉक’ बसला आहे.महावितरणकडून वर्षभर दुरूस्तीची कामे केली जातात. बीड विभागांतर्गत बीड शहरासह बीड ग्रामीण, आष्टी, पाटोदा, शिरूर व गेवराई तालुक्यांचा समावेश आहे. या पाच तालुक्यांत मागील वर्षभरात वाकलेले खांब, पडलेले खांब दुरूस्त करणे, लोंबकाळलेल्या तारा ताणने, रोहित्र संचासह वितरण पेटीची देखभाल करण्यासाठी तब्बल ६० लाख रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले. लाखो रुपयांची उधळपट्टी करूनही बीड शहरासह पाच तालुक्यांमधील खंडित वीज पुरवठा होण्याची परंपरा कायमच आहे. तसेच वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा जैसे थे दिसून येतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यावरही खर्च केला जातो. असे असले तरी थोडेही वादळ आले किंवा पाऊस आला की तासनतास वीज पुरवठा खंडित होता. याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.प्रामाणिक ग्राहकांनी बीले भरूनही सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.गुत्तेदारांसोबत अधिकाऱ्यांचे साटेलोटेज्या गुत्तेदारांना दुरूस्तीसह इतर कामे दिले आहेत, त्यांच्याशी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. कामाच्या एकुण रकमेच्या तुलनेत ५ ते १५ टक्के रक्कम काही अधिकारी घेत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच दुरूस्तीचे कामे निकृष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.वादळ नसताना अन् वीजपुरवठा सुरू असताना तुटली तारसाधारण पंधरा दिवसांपूर्वी सहयोगनगर भागातील स्टेडियमकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू असताना अचानक तार तुटून पडली. हा रस्ता तसा वर्दळीचा. सुदैवाने परिसरातील लोकांनी पाहिल्याने रस्ता अडविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हाच प्रकार जर रात्रीच्या सुमारास झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतरही महावितरण शहरातील तारा दुरूस्ती व तार ताणण्याबाबत जागरूक झाले नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजfundsनिधी