शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शेतकऱ्यांचा ‘शिमगा’, खंडित वीज पुरवठा झाला सुरळीत;पण शॉर्टसर्किटने १५० एकर उसाची होळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 12:51 IST

३० ते ४० शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी

केज/बनसारोळा : केज तालुक्यातील सौंदाना गावच्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा बुधवारी पूर्ववत करण्यात आला खरा; परंतु सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन (शॉर्टसर्किट) उडालेल्या ठिणगीने तब्बल १५० एकरांवरील उसाची अक्षरश: होळी झाली. या अग्नितांडवात ३० ते ४० शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे गावकऱ्यांनी महावितरणच्या नावाने ‘शिमगा’ केला.

सौंदाना गावातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा थकीत वीज बिलापोटी खंडित करण्यात आला होता. काही शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यानंतर बुधवारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन (शॉर्टसर्किट) ठिणग्या उडाल्या. उसाच्या फडातील पाचटीने पेट घेतल्याने फडच्या फड वाऱ्याच्या वेगाने एकामागून एक पेटत गेले. वाऱ्याचा वेगच इतका होता की, सौंदाना शिवारात बघताबघता आगडोंब उसळला. केजहून अग्निशामक दलाची गाडी मागविण्यापूर्वीच १५० एकरांवरील उसाची राखरांगोळी झाली. आगीने रौद्र रूप धारण करीत सौंदाना-बनसारोळा रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूचा ऊस खाक झाला.

कारखान्यांनी ऊसतोड वेळेवर न केल्याने नुकसानया आगीत ३० ते ४० शेतकऱ्यांचा दीडशे एकर ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यांनी ऊसतोड वेळेवर न केल्याने, तसेच महावितरणने वीज तारा व्यवस्थित न बसविल्याने हे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सर्वकाही संपले...या आगीत जगन्नाथ नांदुरे, रमेश भिसे, रुक्मिण भिसे, गणेश भिसे, स्वाती भिसे, राजामती भिसे, प्रदीप भिसे, नरसू भिसे, सूर्यकांत नांदुरे, अशोक नांदुरे, रूपाबाई दहिरे, शहाजी भिसे, महादेव चव्हाण, आदी ३० ते ४० शेतकऱ्यांचा १५० एकर ऊस आगीत जळून खाक झाला. उसासोबत ठिबक संचही जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड