शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

रुपाली ठोंबरेंकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची पोलिसात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 21:29 IST

व्हायरल करण्यात आलेले स्क्रीनशॉट एडिटेड असल्याचा दावा करत आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

NCP Jitendra Awhad: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आज आयोजित केलेल्या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील सहभागी झाले होते. यावेळी आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांनी आव्हाड यांचे कथित व्हॉट्सअॅप संभाषण व्हायरल केले. मात्र हे स्क्रीनशॉट एडिटेड असल्याचा दावा करत आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करत रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं होतं की, "सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी हे सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड." यासोबतच ठोंबरे यांनी व्हॉट्सअॅप संभाषणाचे काही स्क्रीनशॉटही आपल्या पोस्टमध्ये जोडले होते. 

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

रुपाली ठोंबरे यांच्यावर पलटवार करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट मॉर्फ करून वायरल करण्यात आले. त्यात महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या ॲड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असून देखील सत्य-असत्य न तपासता त्यांनी हा मॉर्फ केलेला चॅट वायरल केला. ३ वाजून ०७ मिनिटांनी भाषण संपले आणि ३ वाजून २६ मिनिटांनी हा चॅट या भूमीवर अवतरला. मला समजतच नाही की, जर गुन्हा केलाच नाही तर एवढे अस्वस्थ का होतात? कर नाही तर डर कशाला? असो, बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर,  राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदवलेला आहे," अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.

दरम्यान, "ज्या शिवराज बांगरचा चॅट दाखविला गेलेला आहे त्या शिवराज बांगरच्या कुटुंबियांना आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी वाल्या कराडने जंगजंग पछाडले. शिवराज बांगर हा गरीब कुटुंबातील असल्याने पोलीसही त्याच्यावर पटापट गुन्हे नोंदवतात. सर्वात हास्यास्पद गुन्हा म्हणजे, शिवराज बांगर याने वाल्या कराडकडून खंडणी मागितली, आहे की नाही विनोद," असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४