शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

हरभरा, तुरीचे थकलेले १३ कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:02 AM

जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली

ठळक मुद्देचार दिवसांत मिळणार रक्कम : क्षीरसागरांनी मांडली दुष्काळाची दाहकता

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून दुष्काळाबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हरभरा व तुरीचे १३ कोटी रुपये मंजूर झाले असून ते तातडीने शेतकºयांना येत्या चार दिवसांत मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले.सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात विहिरी घेऊन त्यावर तात्पुरती पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने घेत तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सचिवांशी बोलून विभागीय आयुक्तांना याबाबतच्या डिजाईन आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात जलयुक्त शिवारचा निधी दुप्पट करावा, राशन दुकानातून सवलतीच्या दरात अन्न धान्य उपलब्ध करून देऊन भूमिहीन शेतकरी, शेतमजूर यांना माणसी २० किलो गहू व १५ किलो तांदूळ देण्यात यावा, या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक होकार देऊन त्यास मंजुरी दिली. जिल्ह्यात एम.आर.ई.जी.एस. अंतर्गत शेतकºयांसाठी देण्यात येणाºया विहिरी इष्टांक वाढवून देण्यात याव्यात. ज्या प्रकल्पात पाणीसाठा आहे ते पाणी पिण्यासाठी आरक्षीत करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात यावे, जुन्या रोहयो नुसार कामे चालू करावीत, तातडीने छावण्या उघडून किंवा दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा. दुधाला ५ रुपये दरवाढ करण्यात आली होती ही मुदत आता संपत असून ही दरवाढ पुढेही चालू ठेवावी. राज्यातील दुष्काळी भागात इफको व गोदरेज कंपन्यांकडून पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे. गतवर्षी खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे थकित १३ कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे पैसे वर्ग करण्यात येतील असे सांगितले. मराठवाड्यात गोदावरी खोºयात २५० सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणीही आ.क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले. सिंदफना, कुंडलिका, मांजरा, वाण व मनार या नदीच्या खोºयात कायमस्वरूपी शास्वत पाणी मिळावे, यासाठी सर्वेक्षणाकरीता २० कोटीची तरतूद करावी व बीड, गेवराई, माजलगाव शहराला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जायकवाडी प्रकल्पातून 3 टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडण्यात यावे. सध्या बीड शहरात अमृत अटलचे काम प्रगतीपथावर असून या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली असता या कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर