रस्ता झाला चांगला, जुनाट पूल बनले धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:42+5:302021-07-03T04:21:42+5:30
सखाराम शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र ५२ पासून तीर्थक्षेत्र राक्षसभुवनकडे जाणारा रस्ता चांगला झाला ...

रस्ता झाला चांगला, जुनाट पूल बनले धोकादायक
सखाराम शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र ५२ पासून तीर्थक्षेत्र राक्षसभुवनकडे जाणारा रस्ता चांगला झाला आहे; मात्र रस्त्यावरील जुने पूल वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ पासून तीर्थक्षेत्र असलेल्या शनिच्या राक्षसभुवनकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावरून जाताना जायकवाडी धरणाचा उजवा कालवा दोन, तीन ठिकाणी आडवा जातो. गोदावरीही जवळूनच वाहते. यामुळे छोट्या नद्या, नाल्यांना पावसाळ्यात पूर येतो. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होते. या रस्त्यावर पूल आहेत. परंतु अरुंद आणि जुनाट झाले आहेत; तर काही मोडकळीस आलेले आहेत. या रस्त्याचे इतर काम झाले आहे. परंतु जुनाट पुलाचे काम झाले नाही. सध्या हे जुनाट पूल प्रवासासाठी धोकादायक बनले आहेत.
गंगावाडीजवळ असलेल्या अमृता नदीवर जुनाच पूल असल्याने थोडाही पाऊस झाला की पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे रस्ता बंद होतो. या रस्त्यावर अनेक गावे असल्याने व याच रस्त्यावरून गेवराईकडे यावे लागते. या रस्त्यावरील पुलांच्या दुरुस्तीची अनेकवेळा मागणी केली; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी येथे राज्यभरातून येणा-या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी या रस्त्यावर नवीन पूल उभारावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
.....
नवीन पूल उभारण्याची मागणी
राक्षसभुवन फाटा-ते श्रीक्षेत्र राक्षसभुवन रस्त्यावरील पूल आता जुनाट झाले आहेत. ते कधी मोडतील, कोसळतील, याचा नेम नाही. हे पूल जुने झाले असल्याने अरुंद आहेत. यामुळे ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. तरी या ठिकाणी आता नवीन पूल उभारावेत, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, वंचित बहुजन आघाडीचे पप्पू गायकवाड यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
.....
020721\20210702_125027_14.jpg~020721\20210702_124254_14.jpg