शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

मंजरथच्या सरपंच ऋतुजा आनंदगावकर अपात्र ,कर्तव्यात कसूर केल्याचे झाले सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST

तालुक्यातील मंजरथ येथील महिला सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर ...

तालुक्यातील मंजरथ येथील महिला सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर विभागीय आयुक्तांचे आदेश रद्द करून आनंदगावकर यांना सरपंचपदावरून अपात्र करण्यात आल्याची कार्यवाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

नुकतेच ढोरगाव येथील सरपंच यमुना सरवदे या अपात्र ठरल्या होत्या व आता आनंदगावकर या देखील अपात्र ठरल्याने दोन महिला सरपंच घरी बसल्या आहेत.

माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे सरपंच म्हणून एरोनॉटिकल इंजिनिअर असलेल्या ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या मागील काही वर्षापासून काम पाहतात. त्यांच्या कारभाराविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ राजेभाऊ चुंबळे यांनी आनंदगावकर यांना अपात्र ठरवावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांकडे केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला.

या अहवालामध्ये मंजरथ हे गाव धार्मिक स्थळ असल्याने या गावात येणाऱ्या वाहनांकडून वसुलीची रक्कम बँकेत भरणा न करणे, रोजंदारीवर मजुरांना रोख रक्कम देणे, सरपंच यांनी कोविडसाठी तीन लाख रुपये खर्च केले असे दाखवले, १४ व्या वित्त आयोगातील रमाई योजना कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत, १४ सप्टेंबर १९ व ऑक्टोबर १९ या सभेच्या इतिवृत्तावर ग्रामसेवक व सरपंच यांची सही नाही, तर गैरहजर असलेले सदस्य बाळू काळे व रघुनाथ चुंबळे यांची नावे सूचक, अनुमोदक अशी दाखवण्यात आली आहेत, असे आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी २३ जून २० रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुनावणी घेतली. यावेळी सरपंच गैरहजर असल्याने त्यांचेविरुद्ध अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १६ जुलै २० रोजी विभागीय आयुक्तांना सादर केला.

याबाबत १ जानेवारी २१ रोजी अप्पर विभागीय आयुक्त यांच्या चौकशीत सरपंच, ग्रामसेवक यांनी सर्व कागदपत्रे सादर केल्याचे दिसून आले तसेच या प्रकरणात ठोस कारण असल्याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल स्वीकारणे आयुक्तांना बंधनकारक नाही. या बाबी विचारात घेता आयुक्तांनी ३९-१ चा अर्ज नामंजूर केला होता. यावर रघुनाथ चुंबळे यांनी थेट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अपील दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन सरपंचांनी अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध होते म्हणून अप्पर विभागीय आयुक्तांचे आदेश रद्द करून सरपंच ऋतुजा आनंदगावकर यांना अपात्र ठरवल्याचे आदेश ४ मार्च रोजी बजावण्यात आले आहेत. ही ऑर्डर ९ एप्रिल २१ रोजी मिळाली.