शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मंजरथच्या सरपंच ऋतुजा आनंदगावकर अपात्र ,कर्तव्यात कसूर केल्याचे झाले सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST

तालुक्यातील मंजरथ येथील महिला सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर ...

तालुक्यातील मंजरथ येथील महिला सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर विभागीय आयुक्तांचे आदेश रद्द करून आनंदगावकर यांना सरपंचपदावरून अपात्र करण्यात आल्याची कार्यवाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

नुकतेच ढोरगाव येथील सरपंच यमुना सरवदे या अपात्र ठरल्या होत्या व आता आनंदगावकर या देखील अपात्र ठरल्याने दोन महिला सरपंच घरी बसल्या आहेत.

माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे सरपंच म्हणून एरोनॉटिकल इंजिनिअर असलेल्या ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या मागील काही वर्षापासून काम पाहतात. त्यांच्या कारभाराविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ राजेभाऊ चुंबळे यांनी आनंदगावकर यांना अपात्र ठरवावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांकडे केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला.

या अहवालामध्ये मंजरथ हे गाव धार्मिक स्थळ असल्याने या गावात येणाऱ्या वाहनांकडून वसुलीची रक्कम बँकेत भरणा न करणे, रोजंदारीवर मजुरांना रोख रक्कम देणे, सरपंच यांनी कोविडसाठी तीन लाख रुपये खर्च केले असे दाखवले, १४ व्या वित्त आयोगातील रमाई योजना कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत, १४ सप्टेंबर १९ व ऑक्टोबर १९ या सभेच्या इतिवृत्तावर ग्रामसेवक व सरपंच यांची सही नाही, तर गैरहजर असलेले सदस्य बाळू काळे व रघुनाथ चुंबळे यांची नावे सूचक, अनुमोदक अशी दाखवण्यात आली आहेत, असे आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी २३ जून २० रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुनावणी घेतली. यावेळी सरपंच गैरहजर असल्याने त्यांचेविरुद्ध अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १६ जुलै २० रोजी विभागीय आयुक्तांना सादर केला.

याबाबत १ जानेवारी २१ रोजी अप्पर विभागीय आयुक्त यांच्या चौकशीत सरपंच, ग्रामसेवक यांनी सर्व कागदपत्रे सादर केल्याचे दिसून आले तसेच या प्रकरणात ठोस कारण असल्याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल स्वीकारणे आयुक्तांना बंधनकारक नाही. या बाबी विचारात घेता आयुक्तांनी ३९-१ चा अर्ज नामंजूर केला होता. यावर रघुनाथ चुंबळे यांनी थेट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अपील दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन सरपंचांनी अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध होते म्हणून अप्पर विभागीय आयुक्तांचे आदेश रद्द करून सरपंच ऋतुजा आनंदगावकर यांना अपात्र ठरवल्याचे आदेश ४ मार्च रोजी बजावण्यात आले आहेत. ही ऑर्डर ९ एप्रिल २१ रोजी मिळाली.