शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

गेवराई तालुक्यात पाण्यासाठी दाही दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:23 AM

तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देमजुरांच्या कामाच्या शोधार्थ भटकंती : खाजगी टँकरचा भाव पाचशेवर; ५० ते ६० हजार पशुधन जगविण्याची कसरत

विष्णू गायकवाड।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा निम्मेच झाले. त्यामुळे पिकांबरोबर पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात पाण्याच्या टँकर्सचा भाव ५०० रुपयांवर गेला आहे तर ग्रामीण भागात वाडी, तांङयावर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे. यावर्षी खरीप हंगामाची सुगी नावापुरतीच झाली असून ऐन पावसाळ्यात शिवार उघड झाला आहे.तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात उसतोडीसाठी स्थलांतर करीत आहेत. मुले कडेवर, मजूर फडावर, असे चित्र असून मजुरांची संख्या शासन दरबारी ५० हजार झाली आहे. मात्र हजारो मजूर कामाच्या शोधात मुंबई, पुणे, हैदराबाद , औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर व कारखाना परिसरात स्थलांतरीत होत आहेत.तालुक्यात जनावरांची संख्या ५० ते ६० हजारांपेक्षा अधिक असून त्याप्रमाणात चारा उपलब्ध नाही. सर्वच समाजाचा पारंपरिक व्यवसाय पशुपालन शेती हा आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे एक ते दोन खंडी गुरेढोरे असतात. तसेच अदालीच्या बोलीने शेतकºयांची जनावरे पाळली जातात. त्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे. या गुरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि वैरणच नसल्याने चारा व पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पशु संगोपन गेवराई, शिरसदेवी, उमापूर, मादळमोही, तलवाडा, चकलंबा, पाचेगाव, गढी या गावात छावण्या उघडणे आवश्यक आहे.टँकरसाठी ४६ गावांचा प्रस्तावनागरिकांना दुष्काळाचे चटके मोठया प्रमाणात जाणवू लागले आहेत. सध्या नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. अशा परिस्थितीत गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी आतापर्यंत तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत.पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे १९ नोव्हेंबरपर्यंत ४६ गावाचे टँकर सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव आले आहेत, असे गटविकास अधिकारी के.एम. बागुल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई