शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परळीत राकाँला आघाडी, ग्रामीणमध्ये भाजपच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:20 IST

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात १८ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र १८०० मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली आहे.

ठळक मुद्दे३४ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला; आगामी विधानसभा निवडणूक बहीण - भावासाठी आव्हानात्मक

संजय खाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात १८ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र १८०० मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली आहे. त्यामुळे परळी शहर हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असल्याचे दिसून आले. ३४ वर्षाांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला ग्रामीण भाग हा या निवडणुकीतही अभेद्य राहिला.भाजपचा बालेकिल्ला असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात चांगलीच बाजू भक्कम केली आहे. बीड लोकसभा २०१४ च्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यपेक्षाही महायुतीला या निवडणुकीत कमी मताधिक्य आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा जास्त मतदान असले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य कायम राहील हे आजच सांगता येणार नाही. तथापि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघात मतदारांशी अधिक संपर्क आहे. सर्वसामान्यांच्या बाजूने ते उभे राहतात, कार्यकर्त्यांची तगडी टीम आहे. परळी नगर परिषद, पंचायत समिती, बाजार समिती ताब्यात आहेत. स्वत: धनंजय मुंडे यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे येणाºया निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा सामना भाजपला करावा लागणार आहे.दुसरीकडे ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण सुरू करत लोकसभा निवडणुकीत यश मिळविले. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातही आगामी निवडणुकीत बाजी मारण्याचा त्यांना मोठा विश्वास आहे. शहर व ग्रामीण भागात विकासाची कामे आणणे सुरू केले आहे. विधानसभेला या मतदार संघात ताई व भाऊ यांच्यापैकी कामाचा कोण हेच पाहिले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बहिण भावामध्ये लढत होणार आहे. दोघांनाही येणाºया निवडणुकीत आव्हाने राहणार आहेत. कारण वंचित आघाडी ही प्रत्येक गावात पोहचली आहे.मोठ्या प्रकल्पाची प्रतीक्षाराज्य व केंद्रात भाजपाची सत्ता असूनही परळी मतदारसंघात गत ५ वर्षात नवीन एकही प्रकल्प उभारला गेला नाही.त्यामुळे औद्योगिकदृष्ट्या सत्तेचा उपयोग झाला नाही, कामगारांच्या हाताला काम मिळत नाही, पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण होत नाही, हे महत्त्वाचे प्रश्न कायमच आहेत.शहर व ग्रामीण भागात रस्त्याचे काम जोरात सुरू आहे, अपवाद राहिला परळी-पिंपळा धायगुडा रस्ता.या रस्त्याचे काम हे सुनील हायटेक एजन्सीमुळे अर्धवट राहिले आहे. त्यामुळे जनतेतून मतांमध्ये काही अंशी रोष प्रकटला. रस्ता लवकर होईल या आशेने काहींनी भाजपला पसंती दर्शवली.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे