शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

बीडमध्ये सरपंचाची हत्या होण्यापूर्वी ही कसली मीटिंग?; PSI आणि आरोपीच्या भेटीचा व्हिडीओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:32 IST

जिल्ह्यात पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला जात असतानाच एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Beed Murder Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आठवडा उलटून गेल्यानंतरही गुन्ह्यातील सातपैकी फक्त तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर चार आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात असतानाच एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. केजचा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे दोघे हत्येची घटना होण्यापूर्वी केज शहरातील वसंत विहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे.

संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर कारवाईस टाळाटाळ केल्याप्रकरणी याआधीच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील याला निलंबित करण्यात आलं आहे. अशातच पाटील हा हत्येची घटना होण्यापूर्वी आरोपी सुदर्शन घुले याला का भेटला होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि नराधम आरोपी यांच्या संगनमतानेच या हत्येचा कट रचला गेला का, असाही सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

पोलीस निरीक्षकावरही झाली आहे कारवाई

नागरिकांतील वाढता रोष पाहून आणि आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना हत्या प्रकरणानंतर सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यानंतर केज पोलीस ठाण्याची जबाबदारी जबाबदारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आली.  

हत्येला पोलीसही जबाबदार?

बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी दुपारी ३ वाजता संतोष देशमुख यांचं घुले आणि इतर नराधमांनी अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांचे आत्येभाऊ याबाबतची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांनी तब्बल ३ तास अपहरणाची फिर्यादच नोंदवून घेतली नाही. शिवाय देशमुख यांच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. पोलिसांनी तात्काळ शोधाशोध केली असती तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता," असा आरोप आमदार धस यांनी केला आहे.

आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय यंत्रणा कार्यरत?

मस्साजोग गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची सोमवारी दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर हा वाद झाला त्या कंपनीला २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्किम कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे याची वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेली जवळीक बीड जिल्ह्यात चर्चिली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातपैकी फरार असलेल्या इतर चार आरोपींना वाचवण्यासाठी पडद्याआडून कोणती राजकीय यंत्रणा कार्यरत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेCrime Newsगुन्हेगारीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण