शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

१० दिवसात शेतकऱ्यांना मदत द्या; अन्यथा एकही सरकारी कार्यालय चालू देणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 16:29 IST

लोखंडी सावरगाव येथे "स्वाभिमानी" च्या चक्काजाम आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा

ठळक मुद्देआंदोलनामुळे वाहतुक दोन तास ठप्प

अंबाजोगाई  : बीड जिल्ह्यात सतत १५ दिवस पडलेल्या बेमोसमी मुसळधार अतिवृष्टीने खरिप हंगामातील सोयाबीन, कापूस,तूर,उडीद, मूग,मका,हायब्रीड ज्वारी, बाजरी आदी सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लक्ष रु नुकसान भरपाई व सरसकट पीकविमा तात्काळ वाटप करण्याच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना केज,अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे बुधवारी ( दि ६ ) सकाळी १० वाजता तब्बल २ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळेबीड-लातुर-अंबाजोगाई-कळंब महामार्गावर दुतर्फा शेकडो वाहने अडकून पडली होती.

प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंदोलकांनी अभिवादन करून चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी माजी. आ. पृथ्वीराज साठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.प्रवक्ते प्रकाश बोरगावकर, शेतकरी नेते जयजीत शिंदे, कमलाकर लांडे,वृक्षमित्र सुधाकर देशमुख, लोकजनशक्ती चे राजेश वाहूळे,अंजली पाटील,अंबाजोगाई ता. अध्यक्ष योगेश शेळके,लहू गायकवाड, महेश गंगणे ,प्रमोद पांचाळ,अनिल रांजनकर, परमेश्वर वीर,अभिजीत लोमटे, चंद्रकांत अंबाड,सुग्रीव करपे,भागवत पवार ,शशिकिरण ढगे, आदी संयुक्त पुरोगामी महाआघाडी चे केज,अंबाजोगाई तालुक्यातील मित्रपक्षाचे नेते,पदाधिकारी उपस्थित होते. वरिल नमूद सर्वच पदाधिकऱ्यांनी समायोचित भाषणे करत निष्क्रिय काळजीवाहू सरकारवर टीकास्त्र सोडले.

येत्या १० दिवसात नुकसान भरपाई द्या सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये तात्काळ सरसकट नुकसान भरपाई म्हणून राष्ट्रीय आपत्ती मधून हेक्टरी एक लक्ष रु व सरसकट विना अट पीकविमा वाटप करावा अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली.जर दहा दिवसात नुकसानभरपाई नाही नाही तर बीड जिल्ह्यात कोणतेही सरकारी कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी चालू देणार नाहीत. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. तसेच सर्व गावबंद करून जिल्ह्यात व्यापक बेमुदत जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी प्रशासनाला दिला.

आंदोलनाची दखल घेत अंबाजोगाई तहसीलदार  रुईकर यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे तात्काळ पाठवपुरावा केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात लोखंडी सावरगाव, आपेगाव, धानोरा, सोमनाथ बोरगाव,हिवरा, सनगाव,श्रीपतरायवाडी आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांचा सहभाग होता. अंबाजोगाई ग्रामीण चे  पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने चक्का जाम आंदोलन शांततेत झाले. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड