शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

१० दिवसात शेतकऱ्यांना मदत द्या; अन्यथा एकही सरकारी कार्यालय चालू देणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 16:29 IST

लोखंडी सावरगाव येथे "स्वाभिमानी" च्या चक्काजाम आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा

ठळक मुद्देआंदोलनामुळे वाहतुक दोन तास ठप्प

अंबाजोगाई  : बीड जिल्ह्यात सतत १५ दिवस पडलेल्या बेमोसमी मुसळधार अतिवृष्टीने खरिप हंगामातील सोयाबीन, कापूस,तूर,उडीद, मूग,मका,हायब्रीड ज्वारी, बाजरी आदी सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लक्ष रु नुकसान भरपाई व सरसकट पीकविमा तात्काळ वाटप करण्याच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना केज,अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे बुधवारी ( दि ६ ) सकाळी १० वाजता तब्बल २ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळेबीड-लातुर-अंबाजोगाई-कळंब महामार्गावर दुतर्फा शेकडो वाहने अडकून पडली होती.

प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंदोलकांनी अभिवादन करून चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी माजी. आ. पृथ्वीराज साठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.प्रवक्ते प्रकाश बोरगावकर, शेतकरी नेते जयजीत शिंदे, कमलाकर लांडे,वृक्षमित्र सुधाकर देशमुख, लोकजनशक्ती चे राजेश वाहूळे,अंजली पाटील,अंबाजोगाई ता. अध्यक्ष योगेश शेळके,लहू गायकवाड, महेश गंगणे ,प्रमोद पांचाळ,अनिल रांजनकर, परमेश्वर वीर,अभिजीत लोमटे, चंद्रकांत अंबाड,सुग्रीव करपे,भागवत पवार ,शशिकिरण ढगे, आदी संयुक्त पुरोगामी महाआघाडी चे केज,अंबाजोगाई तालुक्यातील मित्रपक्षाचे नेते,पदाधिकारी उपस्थित होते. वरिल नमूद सर्वच पदाधिकऱ्यांनी समायोचित भाषणे करत निष्क्रिय काळजीवाहू सरकारवर टीकास्त्र सोडले.

येत्या १० दिवसात नुकसान भरपाई द्या सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये तात्काळ सरसकट नुकसान भरपाई म्हणून राष्ट्रीय आपत्ती मधून हेक्टरी एक लक्ष रु व सरसकट विना अट पीकविमा वाटप करावा अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली.जर दहा दिवसात नुकसानभरपाई नाही नाही तर बीड जिल्ह्यात कोणतेही सरकारी कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी चालू देणार नाहीत. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. तसेच सर्व गावबंद करून जिल्ह्यात व्यापक बेमुदत जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी प्रशासनाला दिला.

आंदोलनाची दखल घेत अंबाजोगाई तहसीलदार  रुईकर यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे तात्काळ पाठवपुरावा केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात लोखंडी सावरगाव, आपेगाव, धानोरा, सोमनाथ बोरगाव,हिवरा, सनगाव,श्रीपतरायवाडी आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांचा सहभाग होता. अंबाजोगाई ग्रामीण चे  पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने चक्का जाम आंदोलन शांततेत झाले. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड