शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

जय भवानी साखर कारखान्यात ३ लाख १५ हजार पोती साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST

गेवराई : गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजी नगर या साखर कारखान्यात यंदाच्या गाळप हंगामात माजी ...

गेवराई : गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजी नगर या साखर कारखान्यात यंदाच्या गाळप हंगामात माजी आमदार तथा चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ११५ दिवसांमध्ये तीन लाख १५ हजार ८५ पोत्यांचे उत्पादन केले. ३ लाख ३० हजार २२० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. सरासरी १०.८७ व साखर उतारा ९.६२ याप्रमाणे जय भवानी सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ही कामगिरी केली आहे.

कारखान्यात प्रतिदिन तीन हजार ते साडेतीन हजार उसाचे गाळप होत आहे चालू हंगामामध्ये उपपदार्थ प्रकल्पातील ३४ लाख ५६ हजार २५० लिटर अल्कोहोल निर्मिती झाली असल्याची माहिती जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी दिली. ऊस वाहतूकीसाठी बारकोड प्रणाली

चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वजन काट्यावर होणारी जामिंग रोखण्यासाठी बारकोड प्रणालीचा वापर केला आहे. या प्रयोगामुळे ऊस वाहतूकीत होणाऱ्या अनागोंदीला शिस्त लागली आहे. गाळप हंगामात उस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून वजन काट्यांवर आपला नंबर आधी लागून लवकर रिकामे व्हावे यासाठी मोठी ओढाताण होते. यातून उस वाहतूकदारांमध्ये लहान मोठे वाद निर्माण होत होते. त्यातून इतर वाहनांची वजनाअभावी कोंडी होउन वेळ जात होता. हा प्रकार रोखण्यासाठी कारखान्याने उस पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठी अत्याधुनिक बारकोड यंञणा राबविण्याचे ठरविले. कारखान्यामध्ये उसाचे वजन काटे सीसीटीव्हीच्या निगराणीत आहेत. शंका आली तर तिथे वजनाची मानके ठेवण्यात आली आहेत. बारकोड प्रणालीमुळे ऊस वाहतुकीला शिस्त लागून वजनासाठी होणारी

ओढाताण वाद थांबले आहेत. त्यामुळे सुरळीत गाळप सुरू आहे, असे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी सांगितले