शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

जय भवानी साखर कारखान्यात ३ लाख १५ हजार पोती साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST

गेवराई : गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजी नगर या साखर कारखान्यात यंदाच्या गाळप हंगामात माजी ...

गेवराई : गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजी नगर या साखर कारखान्यात यंदाच्या गाळप हंगामात माजी आमदार तथा चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ११५ दिवसांमध्ये तीन लाख १५ हजार ८५ पोत्यांचे उत्पादन केले. ३ लाख ३० हजार २२० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. सरासरी १०.८७ व साखर उतारा ९.६२ याप्रमाणे जय भवानी सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ही कामगिरी केली आहे.

कारखान्यात प्रतिदिन तीन हजार ते साडेतीन हजार उसाचे गाळप होत आहे चालू हंगामामध्ये उपपदार्थ प्रकल्पातील ३४ लाख ५६ हजार २५० लिटर अल्कोहोल निर्मिती झाली असल्याची माहिती जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी दिली. ऊस वाहतूकीसाठी बारकोड प्रणाली

चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वजन काट्यावर होणारी जामिंग रोखण्यासाठी बारकोड प्रणालीचा वापर केला आहे. या प्रयोगामुळे ऊस वाहतूकीत होणाऱ्या अनागोंदीला शिस्त लागली आहे. गाळप हंगामात उस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून वजन काट्यांवर आपला नंबर आधी लागून लवकर रिकामे व्हावे यासाठी मोठी ओढाताण होते. यातून उस वाहतूकदारांमध्ये लहान मोठे वाद निर्माण होत होते. त्यातून इतर वाहनांची वजनाअभावी कोंडी होउन वेळ जात होता. हा प्रकार रोखण्यासाठी कारखान्याने उस पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठी अत्याधुनिक बारकोड यंञणा राबविण्याचे ठरविले. कारखान्यामध्ये उसाचे वजन काटे सीसीटीव्हीच्या निगराणीत आहेत. शंका आली तर तिथे वजनाची मानके ठेवण्यात आली आहेत. बारकोड प्रणालीमुळे ऊस वाहतुकीला शिस्त लागून वजनासाठी होणारी

ओढाताण वाद थांबले आहेत. त्यामुळे सुरळीत गाळप सुरू आहे, असे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी सांगितले