शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

कापसाच्या वेचणीने काळवंडली लेकरं; मजुराअभावी वेचणीची मदार शालेय विद्यार्थ्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:45 AM

आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देकापूस वेचाणी शालेय विद्यार्थ्यांवर मदार अवलंबूनमजुरांसाठी शेतक-यांची भटकंती सुरुच

बीड : आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांवरच शेतक-यांची मदार असली तरी तालुक्यातील पांढरे सोने गोळा करत असताना लेकर मात्र काळवंडली असल्याचे दिसत आहे. 

यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपासीचे क्षेत्र आहे पण झालेल्या पावसाने मोठा फटका बसला होता. सध्या उन्हाची तीव्रता जाणवत आसल्याने रानोरान कापूस मोठ्या  प्रमाणात  फुलत आहे. शेतातील पांढरे सोने घरात आणण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरु आहे. आपली सर्व कामे बंद ठेवून शेतक-यांचे कुटुंबच कापूस वेचणीसाठी शेतात जात आहे. सध्या शाळेला दिवाळीच्या सुटी आसल्याने मुलेही पालकाच्या मदतीला धावली आहेत. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामीण भागात शुकशुकाट जाणवत आहे. मागील चार वषार्पासून पावसाअभावी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी जेरीस आला होता. त्यामुळे कुठलेच उत्पन्न मिळाले नाही.

यावर्षी पावसाने  दिलासा मिळाल्याने कपासीचे पीक ब-यापैकी हाती लागले आहे. त्यात अधूनमधून वातावरणातही बदल होण्यास सुरुवात झाल्याने शेतक-यांच्या चिंतेत भर पडली आहे. कपाशीची वेचणी सुरू झाल्यावर मजुरांची चणचण नित्याचीच झाल्याने आणि भावही योग्य मिळत नसल्याने शेतातील राडा बाहेर काढण्यासाठी मोठी लगबग सुरु झाली आहे. कापूस वेचणीसाठी आठ ते दहा रुपये भाव दिला जात असल्याने चिमुकले हात मोठ्या प्रमाणावर राबवताना दिसत आहे. शाळा सुरु होण्यास आठवडाभराचा अवधी असल्याने बच्चे कंपनीही शेतात कापूस वेचणीत रमली आहे.

उपाशीपोटी वेचणीअल्पवयीन मुलांना कामाला ठेवणे किंवा काम करून घेणे कायद्याने गुन्हा आसताना देखील आष्टी तालुक्यात मात्र पैशासाठी लेकर उपाशी पोटी कापूस गोळा करताना दिसत आहेत. बालकामगार अधिका-यांनी दखल घेऊन  योग्य कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कडा शहराध्यक्ष संदीप जावळे यांनी केली आहे.

बाजारभावही दोन हजार रुपयांनी कमी मागील वर्षी कापसाला सहा हजार रुपये भाव होता.पण यंदाच्या वर्षी मात्र बाजारपेठेत हाच कापूस ४००० ते ४२०० रुपये एवढा मिळत आहे. दोन हजार रुपयांनी भाव खाली आल्याने शेतकरी संकटात  सापडला आहे.

टॅग्स :cottonकापूस