शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या वेचणीने काळवंडली लेकरं; मजुराअभावी वेचणीची मदार शालेय विद्यार्थ्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 11:47 IST

आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देकापूस वेचाणी शालेय विद्यार्थ्यांवर मदार अवलंबूनमजुरांसाठी शेतक-यांची भटकंती सुरुच

बीड : आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांवरच शेतक-यांची मदार असली तरी तालुक्यातील पांढरे सोने गोळा करत असताना लेकर मात्र काळवंडली असल्याचे दिसत आहे. 

यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपासीचे क्षेत्र आहे पण झालेल्या पावसाने मोठा फटका बसला होता. सध्या उन्हाची तीव्रता जाणवत आसल्याने रानोरान कापूस मोठ्या  प्रमाणात  फुलत आहे. शेतातील पांढरे सोने घरात आणण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरु आहे. आपली सर्व कामे बंद ठेवून शेतक-यांचे कुटुंबच कापूस वेचणीसाठी शेतात जात आहे. सध्या शाळेला दिवाळीच्या सुटी आसल्याने मुलेही पालकाच्या मदतीला धावली आहेत. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामीण भागात शुकशुकाट जाणवत आहे. मागील चार वषार्पासून पावसाअभावी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी जेरीस आला होता. त्यामुळे कुठलेच उत्पन्न मिळाले नाही.

यावर्षी पावसाने  दिलासा मिळाल्याने कपासीचे पीक ब-यापैकी हाती लागले आहे. त्यात अधूनमधून वातावरणातही बदल होण्यास सुरुवात झाल्याने शेतक-यांच्या चिंतेत भर पडली आहे. कपाशीची वेचणी सुरू झाल्यावर मजुरांची चणचण नित्याचीच झाल्याने आणि भावही योग्य मिळत नसल्याने शेतातील राडा बाहेर काढण्यासाठी मोठी लगबग सुरु झाली आहे. कापूस वेचणीसाठी आठ ते दहा रुपये भाव दिला जात असल्याने चिमुकले हात मोठ्या प्रमाणावर राबवताना दिसत आहे. शाळा सुरु होण्यास आठवडाभराचा अवधी असल्याने बच्चे कंपनीही शेतात कापूस वेचणीत रमली आहे.

उपाशीपोटी वेचणीअल्पवयीन मुलांना कामाला ठेवणे किंवा काम करून घेणे कायद्याने गुन्हा आसताना देखील आष्टी तालुक्यात मात्र पैशासाठी लेकर उपाशी पोटी कापूस गोळा करताना दिसत आहेत. बालकामगार अधिका-यांनी दखल घेऊन  योग्य कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कडा शहराध्यक्ष संदीप जावळे यांनी केली आहे.

बाजारभावही दोन हजार रुपयांनी कमी मागील वर्षी कापसाला सहा हजार रुपये भाव होता.पण यंदाच्या वर्षी मात्र बाजारपेठेत हाच कापूस ४००० ते ४२०० रुपये एवढा मिळत आहे. दोन हजार रुपयांनी भाव खाली आल्याने शेतकरी संकटात  सापडला आहे.

टॅग्स :cottonकापूस