शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

माजलगावात तीन कृषी केंद्रांचे परवाने कायम रद्द; तिघांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 5:16 PM

किंमतीपेक्षा जास्त दराने रासायनिक खतांची विक्री केल्याचे आढळुन आल्यास होणार कारवाई

माजलगाव : शहरातील तीन कृषी सेवा केंद्रावर अनियमितता आढळुन आल्याने त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. तर इतर तीन केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्राची तपासणी खत निरीक्षक तथा कृषी  अधिकारी पंचायत समिती यांनी केली. यावेळी केंद्रात रासायनीक खताचा साठा फलक ग्राहकास स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी न लावणे, विक्री बिलामध्ये आवश्यक सर्व मजकुर तसेच विक्रेता व खरेदीदाराची स्वाक्षरी नसणे, साठा पुस्तक प्रमाणीत नसणे , साठा पुस्तक जुळत नसणे , नोंदणी प्रमाणपत्रामध्ये दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेल्या उत्पादकाच्या स्त्रोतांचा समावेश नसणे या त्रुटी आढळुन आल्या.

यामुळे सदरील कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना शिफारस करण्यात आली होती. यांमध्ये सुनावणी घेऊन सुमित अॅग्रो एजन्सी, मोरेश्वर बीज भांडार  व सदगुरु कृषी सेवा केंद्र  यांचे परवाने दिनांक १५ जून २०२० पासून कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. तसेच दिपक बिज भांडार , ज्ञानेश्वर बीज भांडार व नमन कृषी  सेवा केंद्र ( सर्व माजलगाव ) यांचे परवाने दि. १५ जून २०२० पासून पुढील आदेशापर्यंत कृषी अधिकारी बीड यांनी निलबिंत केले आहेत. 

सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके कायदा- अधिनियमानुसार सर्व अभिलेख अद्यावत व परिपूर्ण ठेवावेत. तसेच किंमतीपेक्षा जास्त दराने रासायनिक खतांची विक्री केल्याचे आढळुन आल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती तालुका कृषि अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी दिली आहे.

टॅग्स :suspensionनिलंबनagricultureशेतीBeedबीड