शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

समता परिषदेकडून अध्यादेशाला विरोध; बीडमध्ये निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:18 AM

राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची ५२ टक्केपेक्षा अधिक संख्या असून त्यांना २७ टक्के आरक्षण दिले आहे. यासंदर्भात शासनाने ३१ जुलै रोजी अध्यादेश काढला आहे. याचा निषेध करत हा निर्णय शासनाने मागे घ्यावा व पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शन करण्यात आली.

बीड : राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची ५२ टक्केपेक्षा अधिक संख्या असून त्यांना २७ टक्के आरक्षण दिले आहे. यासंदर्भात शासनाने ३१ जुलै रोजी अध्यादेश काढला आहे. याचा निषेध करत हा निर्णय शासनाने मागे घ्यावा व पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शन करण्यात आली.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करुन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूण ५० टक्क्याच्या मार्यादेत ठेवण्यासाठी दुरुस्ती करुन नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण कमी केले आहे. नवीन निर्णयानूसार गावातील किंवा त्या क्षेत्रातील मागासवर्ग लोकसंख्येच्या पटीत जे प्रमाण असेल त्या प्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.परंतु हा अध्यादेश हास्यास्पद असून शासनाकडे कोणत्या ठिकाणी ओबीसींच्या लोकसंख्येची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही, त्यामुळे प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित कराव्यात हे शासन कसे ठरवणार असा प्रश्न अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी यावेळी केला. ओबीसींवर अन्याय करणारा हा अध्यादेश असून तात्काळ रद्द करावा आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कमी होणार नाही यासाठी न्यायालयामध्ये राज्य शासनाने भक्कमपणे बाजू मांडावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात पदाधिकारी व ओबीसी प्रवर्गातील समाजबांधव, तरूण मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडOBC Reservationओबीसी आरक्षणagitationआंदोलन